Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

महाड येथील चवदार तळ्याचे जलशुद्धीकरण - रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 11 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या चवदार तळ्याच्या साक्षीने सामाजिक क्रांतीची सुरुवात केली त्या महाड येथील चवदार तळ्याला केवळ ऐतिहासिकच नव्हे तर धार्मिक महत्त्वही प्राप्त झाले आहे. या तळ्याला भेट द्यायला जगभरातून आंबेडकर अनुयायी येत असतात. इथले पाणी श्रद्धेने पितात. म्हणूनच इथल्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तळ्यातील गाळ उपसून जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिली. 

चव्हाण पुढे म्हणाले,चवदार तळ्यातील पाण्याचे नमुने अणुजीव शास्त्रज्ञ यांच्याकडे जैविक आणि रासायनिक तपासणीकरिता पाठविले असता तपासणी अहवालात हे पाणी पिण्यायोग्य नाही असे आढळले. या पाण्यावर योग्य ती प्रक्रिया करणे आवश्यक होते. या तळ्यावर 20 मार्च रोजी महाड सत्याग्रहाच्या वर्धापन दिवशी, बुद्ध पौर्णिमेला, 14 एप्रिल आंबेडकर जयंतीला, 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाला आणि 25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवसाला मोठ्या प्रमाणात जनसमुदाय एकत्रित होत असतो.

इथे असलेल्या पाणी समस्येचे निराकरण करण्यासाठी सुमारे एक कोटी 37 लाख रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. यात तळ्यातील गाळ काढणे, आजुबाजूच्या सांडपाण्याचा शिरकाव थांबविणे, पाणी शुद्धीकरणाकरता प्रेशर सॅण्ड फिल्टर व कार्बन फिल्टर यंत्र बसविणे, पाण्यातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी तरंगते एरियेटर बसविणे, भाविकांना शुद्ध पाणी नळाद्वारे मिळेल याची व्यवस्था करणे आणि तलावात मासे व कासव सोडणे आदी उपाय योजना करण्यात येणार आहेत. हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. 

सह्याद्री अतिथी गृह येथे पार पडलेल्या या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार सुभाष पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रविण दरेकर, माजी आमदार माणिक जगताप, महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भदन्त राहुल बोधी आदी उपस्थित होते.

महाडचे चवदार तळे -
• सन 1866 मध्ये महाड नगर पालिका स्थापन झाली व 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी खुले केले.
• या तळ्याचे क्षेत्रफळ 12 हजार 568 चौ. मी. आहे. पावसाळ्यात 5 मी. तर उन्हाळ्यात 2.50मी. पाण्याची खोली असते. पावसाळ्यात 63 दश लक्ष लिटर आणि उन्हाळ्यात 32 दश लक्ष लिटर एवढी पाणी क्षमता आहे.
• गाळ काढणे, काही ठिकाणी गटार बांधणे व इतर अनुषंगिक कामे, 2 लक्ष लिटर प्रतितास क्षमतेचे जलशुद्धीकरण यंत्र बसविणे, एरियेटर बसविणे व विद्युत पुरवठा करणे या कामांसाठी एकूण खर्च 1 कोटी 32 लाख रुपये एवढा प्रस्तावित आहे.
• महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom