Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

६ वर्षांत मुंबईत आगीच्या तब्बल २९ हजार १४० दुर्घटना


मुंबई - सन २०१२ ते एप्रिल २०१८ या सहा वर्षात आगी लागण्याच्या २९ हजार १४० दुर्घटना झाल्या असून, त्यात ३०० लोकांचा मृत्यू झाला. या आगीमध्ये ९२५ नागरिक आणि अग्निशमन दलाचे १२० अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी दिली आहे. 
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे गेल्या ६ वर्षांतील आगींसंबंधी आकडेवारी मागितली होती. त्यानुसार मुंबई अग्निशमन दलाचे जनमाहिती अधिकरी तथा विभागीय अग्निशमन अधिकारी ए. व्ही. परब यांनी शेख यांना माहिती अधिकार अन्वये माहिती दिली. त्यात

२०१२-२०१३ मध्ये एकूण ४ हजार ७५६ आगीच्या घटना घडल्या. यात ६२ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ४४ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण १७७ लोक जखमी झाले असून त्यात १३९ पुरुष आणि ३८ स्त्रियांचा समावेश आहे. १३ अग्निशमन दलाचे अधिकारी/ कर्मचारी जखमी झाले.

२०१३-२०१४ मध्ये एकूण ४ हजार ४०० आगीच्या घटना घडल्या. एकूण ५८ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ३९ पुरुष आणि १९ स्त्रियांचा समावेश आहे. १४१ लोक जखमी झाले असून त्यात ८७ पुरुष आणि ५४ स्त्रियांचा समावेश आहे. २९ अग्निशमन दलाचे अधिकारी/ कर्मचारी जखमी झाले.

२०१४-२०१५ मध्ये एकूण ४ हजार ८४२ आगीच्या घटना घडल्या. एकूण ३२ लोकांचा मृत्यू झाला. त्यात २० पुरुष आणि १२ स्त्रियांचा समावेश आहे. १२५ लोक जखमी झाले. त्यात ९२ पुरुष आणि ३३ स्त्रियांचा समावेश आहे. एका अग्निशमन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ३१ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले.

२०१५-२०१६ मध्ये एकूण ५ हजार २१२ आगीच्या घटना घडल्या. एकूण ४७ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ३४ पुरुष आणि १३ स्त्रियांचा समावेश आहे. १२८ लोक जखमी झाले. त्यात ९१ पुरुष आणि ३७ स्त्रियांचा समावेश आहे. ५ अग्निशमन अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यू झाला. एकूण २३ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले.

२०१६-२०१७ मध्ये एकूण ५ हजार २१ आगीच्या घटना घडल्या. एकूण ३४ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात १८ पुरुष आणि १६ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण ११५ लोक जखमी झाले. त्यात ८३ पुरुष आणि ३२ स्त्रियांचा समावेश आहे. एका अग्निशमन कर्मचाºयाचा मृत्यू झाला. एकूण १३ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले.

२०१७-२०१८ मध्ये एकूण ४ हजार ९२७ आगीच्या घटना घडल्या. एकूण ५५ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ३७ पुरुष आणि १८ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण २१९ लोक जखमी झाले. त्यात १३२ पुरुष आणि ८७ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण ८ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले.

२०१८ पासून एप्रिलपर्यंत एकूण ७१० आगीच्या घटना घडल्या. एकूण ५ लोकांचा मृत्यू झाला. त्यात ४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. एकूण २० लोक जखमी झाले. त्यात १२ पुरुष आणि ८ स्त्रियांचा समावेश आहे. एकूण ३ अग्निशमन दलाचे अधिकारी/कर्मचारी जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ ची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मुख्य अग्निशमन दल अधिकारी आणि मुंबई अग्निशमन दल यांची आहे. तरीदेखील गेल्या सहा वर्षांत देशाच्या आर्थिक राजधानीत तब्बल २९ हजार १४० आगीच्या दुर्घटना झाल्याबद्दल आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी खंत व्यक्त केली आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी अग्निप्रतिबंधक व जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ ची अंमलबजावणी का करत नाही, अजूनही आग दुर्घटनेची वाट पाहत आहे का? अशी विचारणा त्यांनी करून पालिकेचे आयुक्त अजोय मेहता आणि मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना अधिनियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. .

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom