Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

यापुढे भर उन्हात कार्यक्रम नाही, राज्य सरकारचा निर्णय


मुंबई - नवी मुंबईत खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी तब्बल ७ लाख लोक सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उन्हात होते. भरउन्हात हा कार्यक्रम ठेवल्याने १३ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजित करू नये असा निर्णय घेतला आहे. याबाबत नवा जीआर सरकारकडून काढण्यात आला आहे.

खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्युमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा १३ वर पोहचला आहे. या घटनेत अद्याप १० रुग्ण वेगवेगळया रुग्णालयात उपचार घेत आहेत. महिला व बालविकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खारघर दुर्घटनेवर भाष्य केलं. १२ ते ५ वेळेत मोकळ्या जागेवर कार्यक्रम न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी सरकारने जीआर काढला आहे. अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराला उष्माघाताचे गालबोट लागले आहे. नवी मुंबईतील खारघरच्या मैदानात या पुरस्कार सोहळ्यात हजर असलेल्या १३ श्रीसेवकांना उष्माघातानं आपला जीव गमवावा लागला आहे. या झालेल्या १३ जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात असताना मृत्यूचा आकडा सरकारकडून लपवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान आता यात काही लोकांचा चनगरचेंगरी होऊन मृत्यू झाल्याचा आरोपही केला जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom