Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील 1475 मॅनहोल सुरक्षित करण्याचे काम सुरू


मुंबई | प्रतिनिधी - मागीलवर्षी ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसात मुंबईची तुंबई झाली होती. यावेळी पाण्याचा निचरा होण्यासाठी उघडण्यात आलेल्या मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यू नंतर मॅनहोलबाबत मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. अशी दुर्घटना पुन्हा घडू नये यासाठी मुंबईतील सर्व मॅनहोलना नव्या आकाराची जाळी लावण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. पावसापूर्वी पहिल्या टप्प्यात 1475 सुरक्षित जाळ्या लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती प्रमुख अभियंता विद्याधर खणकर यांनी दिली.

मागील मुसळधार पावसात पोटविकार तज्ञ डॉ.अमरापूरकर यांचा उघड्या मॅनहोलने बळी घेतला. या दुर्घटनेनंतर पालिकेच्या निष्काळजीपणा समोर आला. सर्व क्षेत्रातून प्रशासनावर टीकेची झोड उठली. यानंतर अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व मॅनहोलना जाळी लावण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मुंबईतील सर्व मॅनहोलना पावसापूर्वी वेगळ्या आकाराची जाळी बसवण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. एकूण 1475 जाळ्यांच्या निविदाना प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर या कामाला पालिकेच्या संबंधित विभागाने सुरू केले आहे. मे अखेरपूर्वी हे काम पूर्ण केले जाणार आहे. मॅनहोलच्या झाकणाच्या 3.5 इंच खाली जाळी बसवली जाणार आहे. कितीही पाऊस झाला तरी अशी घटना घडणार नाही, अशा प्रकारची जाळी असेल. शहरात एक लाखाहून अधिक सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचे नाले आहेत. सद्या पूर परिस्थिती व पाण्याचा निचरा न होणा-या ठिकाणी या जाळ्या लावल्या जाणार आहेत. प्रथम दादर, हिंदमाता, परेल, मिलन सबवे, किंगसर्कल, चेंबूर आदी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पहिल्या टप्प्यात जाळ्या लावण्या जाणार आहेत. एका मॅनहोलच्या जाळीसाठी सात ते आठ हजार रुपये खर्च येणार आहे. 1475 मॅनहोल या जाळ्यानी सुरक्षित केल्या जाणार आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom