Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मनसेला प्रबळ विरोधी पक्ष बनवा - राज ठाकरे



मुंबई - सत्तेसाठी नाही तर महाराष्ट्राला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मनसेच्या उमेदवारांना मतदान करा, मनसेला प्रबळ विरोधी पक्ष म्हणून निवडून द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या प्रचारसभेतून मतदारांना केले.

राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा बुधवारी पुण्यात होणार होती. ती सभा पावसामुळे रद्द करावी लागल्यानंतर मुंबईत सांताक्रुझ येथे आज झालेली सभा शुभारंभाची सभा ठरली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. तो दाखला देत, आज सरकारला जाब विचारणाऱ्या विरोधी पक्षाची गरज आहे आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल. म्हणूनच मी सत्तेसाठी नाही तर विरोधी पक्ष प्रबळ करावा हे मागणं घेऊन तुमच्यापुढे आलो आहे. येत्या १० दिवसांत माझ्या १८ ते १९ सभा होणार आहेत. या प्रत्येक सभेत मी ही एकच मागणी करणार आहे, असे राज यांनी सांगितले.

विरोधी पक्षासाठी मतदान करा, अशी भूमिका मांडणारा मनसे हा भारतीय राजकारणाच्या इतिहासातील पहिल पक्ष असेल, असेही राज यावेळी म्हणाले. माझा आवाका मला माहीत आहे. त्यामुळे आताच मला सत्ता हवी, असे मी म्हणणार नाही. सत्ता आवाक्यात असेल तेव्ही ते मागणं घेऊन मी नक्कीच तुमच्यापर्यंत येईन. तूर्त मनसेला एक प्रबळ विरोधी पक्ष होण्यासाठी बळ द्या. मी दिलेल्या प्रत्येक उमेदवारात सरकारला जाब विचारेल इतकी आग आहे. तुमचे प्रश्न खंबीरपणे विरारू शकेल इतकी धमक आहे. मनसेचा विरोधी पक्षनेता झाला तर नक्कीच तो या सरकारला नामोहरम करेल, असा विश्वास राज यांनी बोलून दाखवला.

पुण्यात नाही, पाण्यात राहतो ! -
ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत. शहरांचा आज पार विचका झाला आहे. अर्ध्या तासाच्या पावसाने बुधवारी पुणे विस्कळीत झाले. मी पुण्यात नाही पाण्यात राहतो, असे सांगण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. या सगळ्याला सरकारच जबाबदार आहे, असा घणाघात राज यांनी केला.

पीएमसी बँक बुडवणारे भाजपवालेच -
पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतंय, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?, असा सवालही राज यांनी उपस्थित केला.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom