Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

टीका करण्यासंदर्भात भाजपला भारतरत्न मिळायला हवा - संजय राऊत


मुंबई - नाशिक व धुळे येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेत मोठ्या प्रमाणात लोक येण्यास उत्सुक आहेत आणि येत आहेत. त्यामुळे राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवस देशाचे नेतृत्व करतील, असा विश्वास राज्यसभा खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. त्याचवेळी टीका करण्यासंदर्भात भाजपला भारतरत्न मिळायला हवा असा टोला राऊत यांनी लागवला. 

यावेळी बोलताना, महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून विरोधी पक्ष भाजप सरकारवर वेगवेगळ्या टीका करत आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, टीका करण्यासंदर्भात भाजपला भारतरत्न मिळायला हवा, लोकांचा जीव जातोय, जगात काय चाललंय त्यांना ठाऊक नाही. संचारबंदी आनंदासाठी नाही. टीका करणाऱ्यांना भारतरत्न आणि डी-लिट ची पदवी द्या, असा टोला राऊत यांनी भाजपला हाणला. सरकार हतबल नाही, दिल्लीत सरकार हतबल झालंय, आंदोलन तिथे सुरू आहे, अशी चपराकही संजय राऊत यांनी यावेळी लगावली.

बाळासाहेब सानप यांच्या पक्षात प्रवेशाच्या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तीने पक्ष एकत्र लढले तर आम्हाला चांगला स्पेस मिळेल यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत म्हटले की, आमचा एकही फुटणार नाही त्यांचं काय काय फुटेल ते भविष्यात पहाल आणि चाचणी म्हणून पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत आपण पाहिलय. भाजपची त्या ठिकाणी काय स्थिती होती. भविष्यात हे तीन पक्षांचा सरकार आहे. त्यामुळे एका पक्षातून आता इनकमिंग सुरू होणार आहे. नेते येत-जात असतात, नेते गेले म्हणून काय झाले कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत, ते सेनेसाठी पाय घट्ट रोवून उभे राहणार असे राऊत म्हणाले.

नाशिक महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. याठिकाणी शिवसेनेची सानप यांच्या रूपाने देखील मोठी ताकद उभी आहे. पण सानप आता भाजपमध्ये गेल्याने, कार्यकर्ते आता शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे भाजपच्या गडाला खिंडार लावून सेनेचा भगवा पालिकेवर फडकवायचा आहे. नाशिक महापालिकेवर फडकवाच असं संजय राऊत यांनी आज कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशावेळी आवाहन केले.

भाजपचे काही लोक टीका करत आहेत. कोणत्याही विषयावर ते टीका करत सुटतात. टीका करणाऱ्या भाजपच्या लोकांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा", असा टोला संजय राऊत यांनी लगावला. "टीका करणाऱ्यांना लोकं मारायची आहेत. तर मुख्यमंत्र्यांना लोकांचा जीव वाचवायचा आहे. संचारबंदी लादण्यात मुख्यमंत्र्यांना आनंद होत नाही, असंही राऊत म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom