Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Water Cut - ३०, ३१ जानेवारीला मुंबईत पाणी पुरवठा बंद


मुंबई - भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रात चार हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम पालिकेच्या जल विभागाकडून हाती घेतले जाणार आहे. सोमवारी, ३० जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून या कामाला सुरुवात केली जाणार असून मंगळवारी, ३१ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. या कालावधीत पालिकेच्या १२ वॉर्डातील म्हणजे अर्ध्या मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर दादर, माहीमसह काही भागात २५ टक्के पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या जल विभागाचे प्रमुख जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. दरम्यान, दुरुस्तीच्या कालावधीत पाणी जपून वापरा, असे आवाहन जल विभागाने केले आहे.

भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्रास अतिरिक्त ४ हजार मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी जोडण्याचे काम महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात येणार आहे. तसेच भांडुप संकुलाशी संबंधित असलेल्या विविध जल वाहिन्यांवर २ ठिकाणी झडपा बसविणे, नवीन जलवाहिन्यांची जोडणी करणे आणि २ ठिकाणी उद्भवलेली गळती दुरुस्त करणे आदी कामे केली जाणार आहेत. या कामामुळे पश्चिम उपनगरातील के - पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या ९ विभागांमधील अनेक परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. तसेच पूर्व उपनगरातील एस विभाग, एन विभाग आणि एल विभागातील अनेक भागात देखील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. तसेच 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या २ विभागातील माहिम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम या परिसरातील पाणीपुरवठ्यात ३० व ३१ जानेवारी रोजी २५ टक्के कपात करण्यात येणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी ४ ते सायंकाळी ९ या दरम्यान पाणीपुरवठा होतो, त्या भागात ३० जानेवारी रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom