- हा अर्थसंकल्प म्हणजे देशाची विकासयात्रा, असे म्हणत अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केला अंतरिम अर्थसंकल्प
- दरमहा ५००० रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागू होणार नाही
- शैक्षणिक कर्जावर, घरांवर त्याचप्रमाणे बाकी कर्जांवर कोणताही कर लागू होणार नाही
- सामाजिक आणि अन्य क्षेत्रात प्रगती. बांधकाम, आरोग्य, रस्ते विभागात प्रगती
- वैद्यानिक दृष्टीने संस्थांची निर्मिती आणि प्रगती
- डिजिटल इंडियामुळे सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती. २०३०मध्ये भारत म्हणजे प्रत्येक क्षेत्रात प्रगती.
- आपला भारत हा विद्युत वाहनावर काम करेल.
- भरपूर रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न
- नद्यांची स्वच्छता हे आमचे मूळ ध्येय असणार
- भारताचा अंतराळवीर अवकाशात पाठविणार, नवी अवकाश मोहीम
- निरोगी आणि रोगमुक्त भारत
- २०३० पर्यंत चिंतामुक्त भारत
- भारताचा अंतराळवीर अवकाशात पाठविणार, नवी अवकाश मोहीम रत बनवायचा आहे
- महिलांना समान अधिकार, सुरक्षा देणार
- आयकर सूट मर्यादा अडीच लाखांवरुन ५ लाखांवर, सरकारचा अत्यंत मोठा निर्णय
- देशातील सर्वसामान्य करदात्यांना अत्यंत मोठा दिलासा
- संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त इंटरनेट सुविधा उपलब्ध
- ग्रॅच्युटीची मर्यादा १० लाखांवरुन २० लाखांवर
- जीएसटी परिषद घेणार नव्या घरांचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय
- आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
- जीएसटीमध्ये कोणतेही बदल नाहीत
- लघुद्योगांसाठी ६ टक्के जीएसटी
- केंद्राकडून जीएसटीमधील १४ टक्के कर हा राज्यांना दिला जाणार
- भ्रष्टाचारविरोधी कारवायांमधून १,३०,००० कोटी कर वसुली
- सध्या आयकर विभाग ऑनलाईन
- पुढील २ वर्षात आयकरसंबंधी सर्व गोष्टी कॉम्पुटरवर होतील
- मध्यमवर्गीयांचा आयकर कमी करणे हे आमच्या सरकारचे प्रथम प्राधान्य
- सरकारने मागील काळातील ८० सी अंतर्गत योजना ४ वर्षात राबवल्या
- लघुद्योगांमध्ये वाढ होण्यास मदत
- चित्रपटांसाठी फक्त १२ टक्के कर
- घरांवरील कर कमी करण्यासाठी जीएसटी विभागाकडे एका शिस्तमंडळातर्फे अहवाल देणार
- भारतात मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक
- ५ वर्षात मोबाइल डेटाचा वापर ५० टक्क्याने वाढला
- ५ विमान प्रवाश्य़ांची संख्या दुप्पटीने वाढली
- येत्या ५ वर्षात १ लाख गावांना डिजिटल करण्यासाठी प्रयत्न
- गावे देखील डिजिटली विकसित केली जातील
- पायरसीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील
- मनोरंजन क्षेत्राविषयी बोलताना ‘उरी’चा उल्लेख
- मनरेगासाठी ६० हजार कोटी रुपयांची तरतूद
- जवानांकरिता ३५००० कोटींची तरतूद
- सेमी वंदे भारत या हायस्पीड रेल्वेमुळे रेल्वेला गती मिळेल
- रेल्वेसाठी ६४,५०० कोटींची तरतूद
- दररोज देशात २७ किलोमीटरचे रस्ते बांधले जातात
- संरक्षण खात्यासाठी ३ लाख कोटींहून अधिक तरतूद
- ४० वर्षांपासून रखडलेली वन रँक वन पेन्शन योजना लागू
- जवानांसाठी वन रँक वन पेन्शन योजना लागू
- गर्भवती महिलांसाठी २६ आठवडे भरपगारी मात्तृत्व रजा
- उज्ज्वला योजनेंतर्गत ६ कोटी
- मुद्रा योजनेत १५ लाख कोटींचे कर्ज वाटप
- असंघटीत कामगारांसाठी सरकारची श्रमयोगी योजना
- १० कोटी असंघटीत कामगारांना होणार फायदा
- किमान मासिक ३००० मासिक वेतन मिळणार
- २१००० पगार असलेल्या कामगारांना मिळणार बोनस
- असंघटित कामगारांना ३००० मासिक बोनस
- असंघटीत कामगारांसाठी महत्वाची घोषणा
- मेघ पेन्शन योजना जाहीर
- स्वतंत्र फिशरी विभाग स्थापन केले जाणार आहे
- कामधेनू योजनेसाठी ७५० कोटी खर्च करणार सरकार
- २१ हजार पगार असलेल्या असंघटीत कामगारांना ७ हजार बोनस मिळणार
- १० कोटी असंघटीत कामगारांना य़ोजनेचा लाभ
- गाईच्या प्रजाती सुधारण्यासाठी योजना
- नोकरीदऱ्याम्यान मृत्यू झाल्यास आर्थिक मदत अडीच लाखावरुन ६ लाख केली
- पशुसंवर्धनासाठी किसान क्रेडिट कार्ड
- पशुसंवर्धन, मत्स्यपालनासाठी कर्जात २ % सूट
- गोमातेच्या संवर्धनासाठी कामधेनू योजना
- अल्प भूधारक शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत
- ५ एकरपर्यंत शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपयांची मदत
- किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात, लवकरच शेतऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे
- एकूण २२ पिकांचा हमीभाव वाढ, हे यापूर्वी कधीही झाले नाही
- शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना’
- अंबलबजावणी २०१८ डिसेंबरपासून, पहिला २००० चा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार
- २ एकर शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर वर्षाला ६००० रुपये जमा होणार
- २०२१ पर्यंत देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचा संकल्प
- मागास राहिलेल्या ११५ जिल्ह्यांच्या विकासावर भर देणार
- देशात एकूण २१ एम्स कार्यरत, हरियाणात २२वे एम्स बांधणार.
- आयुष्यमान योजनेमुळे गरिबांचे ३ हजार कोटी रुपये वाचले
- प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे १ लाख ५३ हजार घरे बनविण्यात आली
- स्वस्त धान्यासाठी १ लाख ७० हजार कोटींची तरतूद
- मनरेगासाठी मोठे अर्थसाहाय्य
- आम्ही लोकांच्या विश्वासास खरे उतरले
- जीएसटीमुळे देशाचे आर्थिक आरोग्य सुदृढ बनले
- पूर्वीच्या तुलनेत राज्यांना १० % अधिक निधी मिळण्यास सुरुवात
- सकारात्मक योजनांमुळे मोठी परकीय गुंतवणूक
- सरकारचा तोटा ६ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांवर
- २०२० पर्यंत सर्वांना स्वतःचे घर तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार
- भारत पुन्हा एकदा प्रगतीच्या वाटेवर
- महागाईवर नियंत्रण मिळवण्यास केंद्र सरकारला मोठे यश
#Budget2019 - अंतरिम बजेट
February 01, 2019