पावसाळ्यानंतर 14 फुटांहून उंच झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पावसाळ्यानंतर 14 फुटांहून उंच झोपड्यांवर कारवाई करण्याचा निर्णय

Share This
मुंबई, दि. 02 -  मुंबईत अनेक ठिकाणी दुमजली झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे एखाद्या दुर्घटनेत निष्पाप जीवांचा बळी जाऊ शकतो. जुहू गल्लीतील आगीच्या दुर्घटनेतून ही बाब उजेडात आल्यानंतर मुंबईत सर्व 14 फुटांहून उंच झोपडय़ांवर पावसाळ्यानंतर कारवाई करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतला आहे. निवडणुकीचा काळ असल्याने या कारवाईत राजकीय पक्षांकडून अडथळा आल्यास त्यांच्यावरही उचित कारवाईचे संकेत पालिकेने दिले आहेत.
 
झोपडय़ांना 14 फुटांर्पयत उंची वाढविण्याची परवानगी आहे. मात्र अनेक ठिकाणी उंची मर्यादा ओलांडण्यात आली असल्याचे समोर आले आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या जुहू गल्लीतील मेडिकल स्टोअरवरील गच्चीही बेकायदा होती. या दुर्घटनेत 9 जणांचा दुर्दैवी अंत झाला. याची गंभीर दखल पालिकेच्या मासिक बैठकीत आज घेण्यात आली. 14 फुटांहून उंच झोपडय़ांची यादी तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना यावेळी दिले.
 
पावसाळ्यातील चार महिने बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात येत नाही, त्यामुळे ही सर्व यादी या काळात तयार ठेवावी. या झोपडय़ांवर ऑक्टोबरमध्ये म्हणजेच पावसाळ्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई सुरु असताना त्यात अडथळा आणणा-यांची नावांची नोंद घेऊन त्याचा अहवाल तयार करण्याची सुचनाही आयुक्तांनी 24 विभाग कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना करण्यात आली.
 
राजकीय नेत्यांवर कारवाई
पुढच्या वर्षी महापालिकेची निवडणूक असल्याने व्होट बँक म्हणजे झोपडय़ांवर कारवाईस राजकीय पक्षांकडून तीव्र विरोध होणार हे निश्चित आहे. त्यामुळे असा विरोध करणा-या व्यक्ती अथवा संस्थांच्या नावांची नोंद घेऊन त्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages