“समाजभूषण” पुरस्कारप्राप्त मान्यवरांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

“समाजभूषण” पुरस्कारप्राप्त मान्यवरांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ - मुख्यमंत्री

Share This
पुणे दि18 Aug 2016 
समाजातील विषमतेची विषवल्ली दूर करण्याचे काम करणाऱ्यांना शासनाच्यावतीने डॉबाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेआतापर्यंतच्या सर्व समाजभूषण पुरस्कार प्राप्त मान्यवरांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलीतसेच या मान्यवरांना सन्मानाने वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाचे आमंत्रणही त्यांनी दिले.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय  विशेष सहाय्य विभागाच्यावतीने येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात राज्यातील 54 व्यक्तींना  10संस्थांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉबाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेतेंव्हा मुख्यमंत्री बोलत होते.
            
यावेळी पालकमंत्री गिरीश बापटसामाजिक न्याय  विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोलेसामाजिक राज्यमंत्री दिलीप कांबळेजलसंपदा राज्यमंत्रीविजय शिवतारेजिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंदमहापौर प्रशांत जगतापराष्ट्रीय विमुक्त जाती  भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू इदातेखासदार संजय काकडेखासदार अमर साबळेआमदार ॲडजयदेव गायकवाडशरद रणपिसेयोगेश टिळेकरजगदीश मुळीकभीमराव तपकीरआमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते.
        
राजर्षी शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा आरक्षणाची मुहुर्तमेढ रोवलीशाहू महाराजांच्या आरक्षणाच्या संकल्पनेला डॉबाबासाहेब आंबेडकर यांनीसंविधानात्मक चौकट दिली असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेडॉबाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच देशाची प्रगती सुरुअसून आजही देश एकसंध राहीला आहेडॉबाबासाहेब हे खऱ्या अर्थाने देशभक्त होतेत्यांनी आयुष्यभर समाजातील वंचितांचाविचार केलाप्रत्येक वंचिताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी संविधानाच्या माध्यमातून केलेलोकशाहीमुळे प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळाले आहे असेही ते म्हणाले.
        
समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करणाऱ्यांना शासनाने समाजभूषण पुरस्कार दिला आहेराज्यात सामाजिक परिवर्तनाचे कामकरणाऱ्या प्रत्येकाच्या मागे शासन ठाम पणे उभे राहणार आहेडॉबाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालणाऱ्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहेत्यामुळे सर्वसमाजभूषण पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा राज्याच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येणार आहेया माध्यमातून या मान्यवरांना 1200 व्याधींसाठी राज्यातील 500 प्रतिथयश रुग्णालयात कॅशलेस उपचार मिळतीलसामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे परिवर्तन होत आहेअसे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
        
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक स्तरावचे नेतृत्व होतेत्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीचाकार्यक्रम दिमाखात करण्यात आलाजगभरातील लोकांनी त्यांना आदरांजली वाहिलीअशा मोठ्या नेत्याचे स्मारक कोणत्याही वादाशिवाय होण्यासाठी शासनाच्या वतीने सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करुन स्मारकाचा आराखडा तयार केला आहेकोणत्याही परिस्थितीत याचवर्षी बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणालेविविध योजनांच्या माध्यमातून शासन दलित समाजाचा विकास करत आहेडॉबाबासाहेबांनी घालूनदिलेल्या सामाजिक समतेच्या वाटेवर आम्ही चालत आहेमागासवर्गीय समाजासाठी शासनाकडून देण्यात आलेला सर्व निधी त्याच कामांवर खर्च करण्यावरआम्ही विशेष लक्ष देत असून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची सर्व प्रक्रीया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages