रेल्वे, बस सुरू करता मग मंदिर का नाही ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे, बस सुरू करता मग मंदिर का नाही ?

Share This

 

सोलापूर: सरकारकडून रेल्वे, मेट्रो आणि बसेस सुरू केल्या जातात मग मंदिरं का सुरू केली जात नाहीत?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वंचितने आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिनी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये आले असता आंबेडकरांनी हा सवाल केला आहे. 

सरकारने रेल्वे सुरू केल्या आहेत. बसेस-एसटी सुरू केल्या आहेत. आता तर मेट्रोही सुरू करण्यात येणार आहे. मग मंदिरं सुरू करण्यात सरकारला काय अडचण आहे. मंदिरं सुरू करण्याची सरकारने तारीख जाहीर करावी आणि एक नियमावली तयार करावी. करोनाचं संकट असल्याने भाविकांनी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा यावे, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, तोंडाला मास्क लावावेत आदी गोष्टींचा त्यात समावेश कराव्यात, अशा सूचना मी सरकारला केल्या आहेत. या सूचना लोक मान्य करतील आणि त्याचं पालनही करतील. काही नियम आणि अटी घालून मंदिरं सुरू करावीत, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. ती त्यांनी मंजूर करावी, असं सांगतानाच मंदिरं बंद करून भाविकांचं भावनिक आयुष्य वेठीस धरणं योग्य नाही. सरकारपुढे मंदिरं सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असंही ते म्हणाले.

मंदिरं सुरू केल्यावर करोना वाढेल याचा काय तर्क सरकारडे आहे?, असा सवाल करतानाच करोनाच्या संसर्गाची भीती व्यक्त करणारे त्यावर औषध देत नाहीत. आहे त्याच औषधांमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहे. करोनाचा मृत्यूदरही नॉर्मल आहे. करोना नसतानाही आपल्याकडचा मृत्यूदर अधिक होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सरकारने बसेस, रेल्वे आणि दुकाने सुरू केली. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढलेला नाही. एसटी सुरू झाली तेव्हा पहिल्याच दिवशी २१ लाख लोकांनी प्रवास केला. पण त्यामुळे संसर्ग वाढल्याचं कुठंही आढळून आलं नाही. त्यामुळे मंदिरं सुरू झाल्यावर करोना वाढेल याचा सरकारकडे काय तर्क आहे ते स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली. करोनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. पण करोनाचा संसर्ग वाढण्याबाबतचा त्यांचा आणि माझा दृष्टीकोण वेगवेगळा आहे, असंही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages