![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhgyZ7F9emJayq-L0vioerMEc7dsqXVymJHEFF5ERdMUrpualmKPSlRCDVuYGdtYE53x8uCZlagdoi681oKO1Yo4fE5C5XKXwT2efNGlSOGT7NkeKNA8srPAd3u4JzW1GE5KyYp3qPs_PHr5-v6ZUgamaV5GV5f-JW-gy4QjUwQNSXaI2J8bvLGEEjN/w640-h510/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%A1%E0%A5%89.%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE.jpg)
माता आरोग्याच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यांना पुरस्कार देण्यात आले आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये रजिस्ट्रार जनरल इंडियाने प्रकाशित केलेल्या नमुना नोंदणी प्रणालीच्या सर्वेक्षण अहवालानुसार सन २०१७-१९ मध्ये देशातील मातामृत्यु प्रमाण १०३ प्रति लक्षवरुन सन २०१८-२० मध्ये ९७ प्रति लक्ष झालेला आहे.
राज्यामध्ये मातामृत्यू प्रमाण सन २०१७-१९ च्या ३८ प्रति लक्ष वरुन सन २०१८-२० मध्ये ३३ प्रति लक्ष झाला आहे. देशामध्ये मातामृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर महाराष्ट्र राज्य दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर केरळ राज्य आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, मातृत्व अनुदान योजना, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना इत्यादी योजना प्रभावीपणे राबवल्या तसेच सुरक्षित मातृत्वासाठी विविध उपाय योजना राबवल्यामुळे राज्याला साध्य करता आले.
No comments:
Post a Comment