मुंबई : भारतात विविध पंथ, जाती आणि धर्म आहेत. भाषा आणि चालीरीतींची विविधता असूनही भारत एकसंध उभा आहे. परकीय शक्तींनी कितीही प्रयत्न केले तरी देशाची एकसंधता कोणी तोडू शकणार नाही. हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी वरळी कोळीवाडा येथे आयोजित भीमजयंती उत्सवात केले.
महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे कष्टकरी कामगार-मजुरांना पगार मिळाला पाहिजे. गोरगरीबांना मोफत औषधोपचार मिळाला पाहिजे. सरकारी रुग्णालयात महागडी औषधे गरीबांना मोफत उपलब्ध झाली पाहिजेत. ज्या भागात जास्त पाऊस पडेल, त्या भागात पाणी अडवून ते नद्यांना जोडावे आणि ज्या भागात पाऊस पडत नाही त्या भागात वळवावे, असे मत व्यक्त करून लोकनेते रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या भल्यासाठी केलेल्या कायद्याच्या तसेच त्यांनी देशाला सांगितलेल्या जल नियोजनाची माहिती या वेळी दिली. वरळी कोळीवाड्यानंतर माटुंगा लेबर कॅम्प, जोगेश्वरी, मेघवाडी आणि वांद्रे गांधीनगर, येथील भीमजयंती उत्सवाला आठवले यांनी भेट दिली.
Post Top Ad
19 April 2013

Home
Unlabelled
संविधानामुळेच भारत एकसंध - आठवले
संविधानामुळेच भारत एकसंध - आठवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. २०१२ - १३ मध्ये जेपीएन न्यूजच्या www.jpnnews.in या डोमेन नावाची (Registered Domain ID: D7956137-IN (Date - 15/12/2013) नोंदणी करण्यात आली आहे. जेपीएन न्यूजची भारत सरकारच्या उद्यम नोंदणी विभागाकडे न्यूज एजंसी म्हणून नोंद आहे.
जेपीएन न्यूजवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका/ पालिका/ नगर परिषद), पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख, ब्लॉग यांना प्रसिद्धी दिली जाते.
No comments:
Post a Comment