मुंबईत आंबा महोत्सव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत आंबा महोत्सव

Share This
मुंबई : केमिकलमध्ये पिकवलेला आंबा खाऊन आजारी पडणार्‍यांची भीती दूर करण्यासाठी कोकण विकास प्रतिष्ठानने आंबा महोत्सव आयोजित केल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील आंबा मुंबईकरांना खायला मिळणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र तावडे यांनी पत्रकार संघ येथे मंगळवारी दिली. आंबा अजूनही मोठय़ा प्रमाणात बाजारात आला नाही. कोकणातल्या आंब्याची चव वेगळी असते. १३ एप्रिलपासून विलेपार्ले, दादर, ठाणे, बोरिवली, मुलुंड अशा वेगवेगळय़ा ठिकाणी प्रतिष्ठानने आंबा महोत्सव आयोजित केला आहे. याद्वारे वाजवी दरात शुद्ध आंबा मुंबईकरांना मिळणार आहे. यंदा कोकणातील आंब्याचे अपेक्षित उत्पन्न एक लाख २८ हजार मेट्रिक टन आहे. यातील ३६0 कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली जाईल तर १00 कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला जाईल, असे तावडे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages