नवी दिल्ली : देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना प्रशासकीय यंत्रणेवर ताणही वाढत चालला आहे. असे असतानाही भारतात तब्बल दीड हजार आयएएस अधिकार्यांची पदे रिक्त असल्याचे सरकारने गुरुवारी सांगितले आहे. आतापर्यंत ६ हजार २१७ पदांना मंजुरी मिळालेली असल्याचेही सरकारने म्हटले आहे.
आयएएस आणि आयपीएस अधिकार्यांचा तुटवडा असल्यामुळे देशातील विविध भागांमध्ये प्रशासकीय कामे मोठय़ा प्रमाणावर खोळंबली आहेत. त्यातच एका अधिकार्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरचा भार दिवसेंदिवस वाढत आहे. अशी परिस्थिती असतानाही देशात आयएएस अधिकार्यांची भरती करण्याबाबत भारत सरकार उदासीन असल्याचे दिसत आहे. अद्यापही दीड हजार आयएएस अधिकार्यांची पदे भरणे बाकी आहे. कर्मचारी, लोकतक्रार आणि पेन्शन राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये ११९, मध्य प्रदेशात १0५ आणि बिहारमध्ये ९0 पदे रिक्त आहेत. याशिवाय झारखंडमध्ये ८४ आणि आंध्र प्रदेश व अरुणाचल प्रदेशात प्रत्येकी ७८ पदांची भरती करणे बाकी आहे. दुसर्या एका प्रश्नाला उत्तर देताना नारायणसामी म्हणाले की, २0१२ मध्ये केंद्रीय सतर्कता आयोगाला भ्रष्टाचाराच्या २९ हजार ५00 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय गेल्या वर्षात २८ हजार ७५५ सामान्य तक्रारी आणि ८0४ व्हिसल ब्लोवरच्या तक्रारी मिळाल्या आहेत. २0११ मध्ये सतर्कता आयोगाला १७ हजार ८३0 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
Home
Unlabelled
आयएएस अधिकार्यांची दीड हजार पदे रिक्त
आयएएस अधिकार्यांची दीड हजार पदे रिक्त
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

No comments:
Post a Comment