मुंबई मेट्रोच्या दरवाढीला अप्रत्यक्षपणे सरकारच जबाबदार - सचिन अहिर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबई मेट्रोच्या दरवाढीला अप्रत्यक्षपणे सरकारच जबाबदार - सचिन अहिर

Share This

मुंबईमुंबई मेट्रोची तिकिट दरवाढ हा मुंबई मेट्रोवन कंपनीचा निर्णय असला तरीही,अप्रत्यक्षपणे त्याला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आराेप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केला आहेकारण या कंपनीला गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या तोट्याची भरपाई अनुदान रुपाने देण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्यानेच ही दरवाढ झाली असून त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला चाट बसली आहेएकिकडे न्यायालयासमोर किंवा जनतेसमोर तिकिट दरवाढीविरोधात भुमिका घ्यायची आणि दुसरीकडे तिकिट दरवाढीसाठी छुप्या मार्गाने संबंधित कंपनीला मदत करायचीअशी दुटप्पी भुमिका या सरकारची असल्याचेही ते म्हणाले.


येत्या १ डिसेंबरपासून मुंबई मेट्रोवन प्रालिया कंपनीच्या वतीने मुंबई मेट्रो रेल्वेच्या तिकिट दरात वाढ केली आहेकिमान १० रुपये हे तिकिट दर कायम ठेवून पुढच्या टप्प्यातील तिकीट दरात प्रत्येकी पाच रुपये वाढ करण्यात आली आहेतसेच मासिक पासच्या दरातही ४५ ते ५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.अगोदरच जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडलेले असतानाच या तिकीट दरवाढीने मुंबईकरांना मोठा आर्थिक भार सोसावा लागणार आहेयाबाबत बोलताना अहिर म्हणाले कीराज्य सरकारने जर या प्रकरणात वेळीच हस्तक्षेप केला असतातर ही दरवाढ टाळता आली असतीकारण आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात या कंपनीला ३०० कोटीचा आर्थिक तोटा झाला आहेही रक्कम आपल्याला अनुदाना पोटी राज्य सरकारने द्यावी,अशी मागणी कंपनीच्या वतीने करण्यात आली होतीअन्यथा आम्ही दरवाढ करून ही रक्कम वसुल करू अशी भुमिका कंपनीने घेतली होतीमात्र त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करून सरकारने एक प्रकारे कंपनीला दरवाढीसाठी हिरवा कंदीलच दाखवल्याचे अहिर म्हणालेहे सरकारचे नाकर्तेपण तर आहेतशिवाय सरकारची ही भुमिका पाहता सत्ताधाऱ्यांचे कंपनीशी साटेलोटे असल्याचा संशय घेण्यास जागा असल्याचेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages