Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गिरगाव चौपाटीवरील आगीसारख्या दुर्घटना टाळणार-मुख्यमंत्री

मुंबई - ‘मेक इन इंडिया‘ सप्ताहादरम्यान गिरगाव चौपाटीवरील मनोरंजन कार्यक्रमाच्या वेळी लागलेल्या आगीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रशिक्षित मनुष्यबळ ठेवणे यापुढे बंधनकारक असेल. अग्निसुरक्षेबाबत परवानगी देण्यासाठी नवीन कार्यप्रणाली तयार करण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
गिरगाव चौपाटीवरील दुर्घटनेबाबत कॉंग्रेसचे संजय दत्त यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी रविवारी केरळमध्ये घडलेल्या दुर्घटनेचा उल्लेख करून दत्त यांनी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना सांगाव्यात, अशी मागणी केली. गिरगाव चौपाटीवरील मनोरंजनाच्या कार्यक्रमाची जबाबदारी "कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज‘ या संस्थेकडे होती. या संस्थेने "व्हिझक्राफ्ट‘ कंपनीसोबत करार केला होता. कार्यक्रमाची परवानगी देताना मुंबई अग्निशमन दलाकडून संबंधित ठिकाणचे फायर ऑडिट करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आधी अग्निशमन अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली असता, मंचाखाली ज्वलनशील पदार्थ ठेवल्याचे निदर्शनास आले. त्या वेळी ते हटवण्याचे आदेशही दिले होते; मात्र आयोजक कंपनीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली. या संदर्भात कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात येणार आहे. आयोजकांना त्याचे तंतोतंत पालन करावे लागेल. कार्यक्रमाच्या ठिकाणी शक्‍यतो ज्वलनशील पदार्थ किंवा फटाके ठेवण्यावर निर्बंध असतील. ज्वलनशील पदार्थ आवश्‍यक असतील, तर तिथे प्रशिक्षित मनुष्यबळ ठेवावे लागेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom