निकालामध्ये पुन्हा गोंधळ झाल्यास राज्यपाल आणि सरकार जबाबदार - डॉ. भालचंद्र मुणगेकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 October 2017

निकालामध्ये पुन्हा गोंधळ झाल्यास राज्यपाल आणि सरकार जबाबदार - डॉ. भालचंद्र मुणगेकर


मुंबई - मुंबई विद्यापीठात निकालाबाबत गोधळ सुरु असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतरही नोव्हेंबर महिन्यात होणा-या परीक्षांच्या उत्तरपत्रिकाही आॅनलाईन तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला माझा विरोध असून निकालामध्ये पुन्हा गोंधळ झाल्यास त्याला सर्वस्वी राज्यपाल आणि राज्य सरकार जबाबदार राहील असा इशारा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु व माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी दिला आहे. तसेच कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर अजूनही कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न मुणगेकर यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठात सुरु असलेल्या गोंधळाच्या पार्श्ववभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघात एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी कुलगुरू संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधला. विद्यापीठाने ४७७ निकाल जाहीर केल्याचा दावा केला. प्रत्यक्षात अजूनही ११ हजार विद्यार्थी हे निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. १ हजार ६०० विद्यार्थ्यांना सरासरी गुण देणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. पण, हे गुण देणार म्हणजे काय? या विषयी स्पष्टता नाही. त्यामुळे अजूनही गोंधळ सुरुच आहे. या सर्व प्रकाराला डॉ. देशमुख जबाबदार असल्याची टीका केली.

त्यांच्यावर विद्यापीठ कायद्याच्या कलम ११ (१४) (९) कलमानुसार कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत ही मुणगेकरांनी यावेळी व्यक्त केले. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला विरोध नाही. ती काळाची गरज आहे. पण ज्या मेरीट ट्रॅक कंपनीमुळे उत्तरपत्रिका तपासणीत इतका गोंधळ झाला त्याच कंपनीमार्फत पुढील पेपर तपासणीची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेणे चुकीचा आहे. कंपनीला १० उपाय विद्यापीठाने सुचवल्याचे सांगण्यात आले. पण, यात नक्की काय उपाय सुचवले हे विद्यापीठाने जाहीर करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad

JPN NEWS