मुंबई - विषाणू, जीवाणू किंवा बुरशीसारख्या परोपजिवींमुळे होणारा सेप्सिस हा असा संसर्ग आहे, ज्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहेत. दरवर्षी जगातील सुमारे २ ते ३ कोटी रुग्ण या संसर्गाने बाधीत होतात, असा अंदाज बांधण्यात आला असून जगात काही सेकंदांमागे कुणीतरी सेप्सिसच्या संसर्गाने मरण पावते, असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे. या संसर्गाची तपासणी, निदान झाले नाही आणि त्यावर वेळेत उपचार झाले नाहीत, तर त्यामुळे सेप्सिस शॉक, अवयव निकामी होणे आणि मृत्यू ओढवू शकतात. उशिरा निदान हा एक मोठा काळजीचा विषय आहे. कारण सेप्सिसच्या निदानाच्या प्रत्येक तासाच्या विलंबामुळे मृत्यूचा धोका ८ टक्क्यांनी वाढतो. त्याचवेळी २०१७ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ५ वर्षांच्या सेप्सिस अभ्यासात एकाच केंद्रातील, रुग्णालयातील, आयसीयूमधील आणि २८ दिवसांमधील मृत्यूदर अनुक्रमे ५६ टक्के, ६३ टक्के आणि ६३ टक्के असल्याचे दिसून आले. नवजात बालके, वृद्ध, कर्करोगबाधित आणि प्रत्यारोपणाचे रुग्ण तसेच एचआयव्हीने बाधित लोकांना सेप्सिसचा धोका जास्त प्रमाणात आढळतो. हा संसर्ग शरीरात वेगाने पसरतो आणि तो तपासला न गेल्यास किंवा त्याचे निदान न झाल्यास आणि त्यावर वेळेत उपचार न झाल्यास सेप्सिस शॉक, अवयव बंद पडणे आणि मृत्यू असे प्रकार घडू शकतात, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
Post Top Ad
18 September 2018
सेप्सिसचा संसर्ग जीवाणूमुळे ३४ टक्के रुग्णांचा मृत्यू
Tags
# आरोग्य
Share This
About Anonymous
आरोग्य
Tags:
आरोग्य
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

