शिवसेनेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना नसीम खान म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकसभेत मांडलेले नागिरकत्व सुधारणा विधेयक हे संविधान विरोधी असून लोकशाहीवरचा हल्ला आहे, अशा विधेयकाला पाठिंबा देण्यापूर्वी शिवसेनेने महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतलेले नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करुन सरकार बनवलेले आहे. सत्ता स्थापन करण्याआधी सर्व मित्रपक्षांनी किमान समान कार्यक्रमही बनवलेला आहे, असे असताना शिवसेनेने घेतलेले ही भूमिका एकतर्फी आणि किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन करणारी असून त्यांनी तातडीने यावर खुलासा केला पाहिजे, अशी मगणी नसीम खान यांनी केली आहे.
शिवसेनेकडून किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन ! - नसीम खान
December 10, 2019
शिवसेनेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना नसीम खान म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने लोकसभेत मांडलेले नागिरकत्व सुधारणा विधेयक हे संविधान विरोधी असून लोकशाहीवरचा हल्ला आहे, अशा विधेयकाला पाठिंबा देण्यापूर्वी शिवसेनेने महाराष्ट्रातील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतलेले नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेने एनडीएमधून बाहेर पडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांबरोबर महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करुन सरकार बनवलेले आहे. सत्ता स्थापन करण्याआधी सर्व मित्रपक्षांनी किमान समान कार्यक्रमही बनवलेला आहे, असे असताना शिवसेनेने घेतलेले ही भूमिका एकतर्फी आणि किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन करणारी असून त्यांनी तातडीने यावर खुलासा केला पाहिजे, अशी मगणी नसीम खान यांनी केली आहे.