![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhHEnnCmgj1G_K22URgdnAniiCRviXfMTs668bI1o8kSpevpc2rbYZQ4HMJZc2o12mIx3Y-qxWQuAJ_a0Mqef8HcKZXoXQA21toBsg3CfG-Zce80pb2LrYvfYR1VXAJ8rAz4tBy38KG11M/w640-h344/image.png)
मुंबईत झपाट्याने वाढलेली रुग्णसंख्या मागील 10 ते 12 दिवसांपासून स्थिर राहिली होती. 23 एप्रिलला रुग्णांची संख्या 7221 वर होती. ही रुग्णसंख्या घटते आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधामुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण येत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मुंबईत आतापर्यंत 627651 रुग्णांची नोंद झाली आहे. यातील 537711 रु ग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 12783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची आकडेवारीही कमी झाली आहे. ११ एप्रिलपर्यंत ९२,४६४ सक्रिय रुग्णांची नोंद झाली होती. ही संख्या 25 एप्रिलला कमी होऊन 75740 वर आली आहे. घटणा-या रुग्णसंख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे.
No comments:
Post a Comment