| मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळ पसरला असताना इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दल राजकीय नेत्यांनी नाराजी दर्शविली असताना भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वेंगसरकर राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी धावून आले आहेत. आयपीएल स्पर्धेतील आणखी एका अंतिम सामन्याचे आयोजन दुष्काळग्रस्तांसाठी करावे, अशी मागणी वेंगसरकरांनी पत्राद्वारे भारतीय क्रिकेट मंडळाला केली आहे. या पत्रात माजी कर्णधाराने सुचवले आहे की, आयपीएलचा अंतिम सामना २६ मे रोजी खेळला जाणार आहे. तो सामना कोलकात्यात होणार असल्यामुळे एक दिवसाच्या अंतराने २८ मे रोजी दुसरा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर किंवा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयोजित करावा. या सामन्याद्वारे मिळणारे पैसे दुष्काळपीडितांच्या मदतीसाठी उपयोगी पडतील, असेही त्यांनी म्हटले आहे. आपल्या पत्रात वेंगसरकरांनी म्हटले आहे की, भारताचा आणि मुंबईचा माजी कर्णधार या नात्याने मी हे पत्र लिहीत आहे. महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळाचे चटके नागरिकांना बसत आहेत. यापूर्वी बीसीसीआयने अशा प्रकारच्या प्रसंगी मदतीचा हात पुढे केला आहे. दिलीप वेंगसरकर यांच्या पत्राबाबत बीसीसीआय कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. |
Home
Unlabelled
आयपीएल सामन्याचे आयोजन दुष्काळग्रस्तांसाठी करावे - दिलीप वेंगसरकर
आयपीएल सामन्याचे आयोजन दुष्काळग्रस्तांसाठी करावे - दिलीप वेंगसरकर
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2012-13. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

No comments:
Post a Comment