मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणामध्ये गेल्या १० दिवसांन पासून समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्या १० दिवसात दोन महिन्यांचा पाणीसाठा जमा झाल्याने मुंबई करांना थोडा दिलासा मिळालेला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये १४ जुलैला ९६९९२ दशलक्ष लिटर्स एवढा पाणीसाठा जमा होता. हा पाणी साठ मुंबईला २६ दिवस पुरेल इतकाच होता परंतु यानंतर गेले १० दिवस तलाव क्षेत्रात समाधान कारक पाऊस पडत असल्याने २४ जुलैला सकाळी ६ वाजेपर्यंत ३ लाख १४ हजार ९७८ दशलक्ष लिटर्स पाण्याची नोंद झाली आहे . २४ तारखेपर्यंत ८५ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला असून गेल्या १० दिवसात तलावान मध्ये ५९ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे. मोडक सागर ८२१४२, तानसा ३३९२५, विहार ८५६१, तुलसी ६६३२, अप्पर वैतरणा २४९२६, भातसा १२७४८१, आणि मध्य वैतरणा ३१३१० अशा एकूण ३१४९७८ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला आहे .
Post Top Ad
25 July 2014
Home
Unlabelled
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात १० दिवसात २ महिन्यांचा पाणीसाठा जमा
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात १० दिवसात २ महिन्यांचा पाणीसाठा जमा
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

