लाचखोरांना चाप लावण्यासाठी राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नांदेड, नागपूर, अमरावती आणि मुंबई अशा एकूण ८ परिक्षेत्रांना अधिकाधिक कारवाया करण्याचे लक्ष्य (टार्गेट) ठरवून दिले. त्यासाठी विविध योजनाही अंमलात आणल्यामुळे कारवाईचा आकडा झपाट्याने पुढे सरकला. आतापर्यंत सर्व परिक्षेत्रांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत एकूण १४ खात्यांमधील ३३ प्रकरणांद्वारे ६0 आरोपींवर गुन्हे दाखल केले. यात ६६ कोटी ४५ लाख इतकी प्रचंड बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. तसेच गेल्या ९ महिन्यांमध्ये ८१0 सापळे रचून १ कोटी ८0 लाख ४६ हजारांची लाचेची रक्कमही विभागाने जप्त केली.
Post Top Ad
04 September 2014
Home
Unlabelled
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

