लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ

Share This
लाचखोरांना चाप लावण्यासाठी राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नांदेड, नागपूर, अमरावती आणि मुंबई अशा एकूण ८ परिक्षेत्रांना अधिकाधिक कारवाया करण्याचे लक्ष्य (टार्गेट) ठरवून दिले. त्यासाठी विविध योजनाही अंमलात आणल्यामुळे कारवाईचा आकडा झपाट्याने पुढे सरकला. आतापर्यंत सर्व परिक्षेत्रांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत एकूण १४ खात्यांमधील ३३ प्रकरणांद्वारे ६0 आरोपींवर गुन्हे दाखल केले. यात ६६ कोटी ४५ लाख इतकी प्रचंड बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. तसेच गेल्या ९ महिन्यांमध्ये ८१0 सापळे रचून १ कोटी ८0 लाख ४६ हजारांची लाचेची रक्कमही विभागाने जप्त केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages