मुंबईत 36 जागांसाठी 520 उमेदवार रिंगणात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत 36 जागांसाठी 520 उमेदवार रिंगणात

Share This
मुंबई - मुंबई शहर अणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यांतील 36 विधानसभा मतदारसंघांत 520 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 72 जणांनी माघार घेतली. राजकीय पक्ष आणि अपक्ष असे 593 उमेदवारी अर्ज वैध ठरले होते; त्यापैकी 72 जणांनी माघार घेतली. मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघांत 139 उमेदवार रिंगणात आहेत. येथील 165 अर्ज वैध ठरले होते; त्यापैकी 26 जणांनी उमेदवारी मागे घेतली. मुंबई उपनगर जिल्ह्यातील 26 जागांसाठी वैध ठरलेल्या 381 उमेदवारांपैकी 46 जणांनी माघार घेतली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages