रोहित वेमुलाच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार - सचिन अहिर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2016

रोहित वेमुलाच्या आत्महत्येला सरकारच जबाबदार - सचिन अहिर

मुंबई / JPN NEWS ( Voice Of citizens) www.jpnnews.in
हैदराबाद विद्यापिठातील राेहित वेमुला या विद्यार्थ्याच्या आत्महत्येला भाजपची जातीयवादी मानसिकता जबाबदार असून सत्ताधाऱ्यांनी आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपली कुजकट मानसिकता बदलण्याची गरज अाहेअसे सांगत रोहितच्या आत्महत्येप्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरूंसह बंडारू दत्तात्रेय आणि स्मृती इराणी या दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी राजिनामा द्यावाअशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली आहेरोहितला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी माअहिर यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळी वरळी नाका येथे रास्ता रोकाे आंदोलन करण्यात आले.


हैदराबाद विद्यापीठ प्रशासन आणि राजकीय दबावाला कंटाळून रोहित वेमुला या तरूणाने आत्महत्या केलीरोहितच्या आत्महत्येबद्दल शोक व्यक्त करत मा.अहिर म्हणाले कीत्याच्या आत्महत्येमुळे आपण भविष्यातील एक चांगला संशोधक गमावला आहेया दुर्दैवी घटनेमुळे पुरोगामी आंबेडकरी विचारांचे या सरकारला वावडे असल्याची बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहेया अगोदर चेन्नई आयआयटीमध्येही पेरियार आंबेडकर स्टडी सर्कलवरही या सरकारने बंदी घातल्याच्या घटनेचा उल्लेखही अहिर यांनी यावेळी केलातसेच ज्या तातडीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी सरकारची बाजू सावरण्यासाठी पुढे आल्या त्यावरून या प्रकरणाला सरकारच जबाबदार असल्याची बाबही अधारेखित होत आहेआता या प्रकरणी आत्महत्या केलेला विद्यार्थी हा दलित नव्हताअसे अनेक मुद्दे उपस्थित करून मुळ विषय भरकटवण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केलीतसेच आता आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा भाजपने आपली रोगट आणि जातियवादी मानसिकता बदलण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी दिलाया आंदोलनात मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Bottom Ad