मुंबई / प्रतिनिधी - पूर्व उपनगरांतील डोंगर उतारावर वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने संबंधितांना केले आहे. पावसाळ्यात दरड कोसळून डोंगर उतारावरील ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी होते. हे टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने मे महिन्यातच डोंगर उतारावरील रहिवाशांना धोक्याचा इशारा दिला आहे.
‘एम/पूर्व’ विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णू नगर या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना महापालिका प्रशासनातर्फे सूचित करण्यात येत आहे की, येत्या पावसाळ्यात जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपडय़ा वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महापालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाश्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.
‘एम/पूर्व’ विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ तसेच वाशीनाका येथील ओम गणेश नगर, राहुल नगर, नागाबाबा नगर, सह्याद्री नगर, अशोक नगर, भारत नगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णू नगर या ठिकाणच्या टेकडीच्या / डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांना महापालिका प्रशासनातर्फे सूचित करण्यात येत आहे की, येत्या पावसाळ्यात जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे झोपडय़ा वाहून जाण्याच्या संभाव्य घटना घडण्याची शक्यता असल्याने स्थानिक रहिवाश्यांनी स्वतःहून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे महापालिका प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात येत आहे. स्थलांतर न करता तेथेच राहणाऱया रहिवाश्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर रहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास बृहन्मुंबई महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे पालिका प्रशासनाने कळविले आहे.

No comments:
Post a Comment