मानखुर्द मधील झोपडीधारकाना 14 वर्षात पर्यायी घरे नाहीच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 April 2017

मानखुर्द मधील झोपडीधारकाना 14 वर्षात पर्यायी घरे नाहीच


महापौरांचे त्वरित कारवाईचे आदेश-मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या वतीने नाले बनवताना त्या ठिकाणच्या पात्र झोपड़ी धारकाना पर्यायी घरे दिली जातात. मात्र मानखुर्द सोनापूर येथील जयहिंद नगर मधील 19 झोपड़ी धारकाना गेल्या 14 वर्षात पर्यायी घरे दिली नसल्याने या झोपड़ी धारकाना न्याय द्यावा अशी मागणी दशरथ भालेराव यांनी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे केली आहे.

मानखुर्द सोनापूर जयहिंद नगर येथील नाला बनवताना सन 2003 मध्ये येथील कलेक्टरच्या जागेवरील झोपडी धारकाना पर्यायी घरे देवू असे आश्वासन पालिकेने दिले होते. या जागेवरील 97 - 98 लोकांचे मंडाळा येथे तर काही लोक कोर्टात गेले त्यांचे भुजबळ वाडी येथे पुनर्वसन करण्यात आले. तर 24 लोकांचे पुनर्वसन बाकी होते. मुंबई महापालिकेने राज्य सरकारकड़े या लोकांचे पुनर्वसन करावे अशी मागणी केली असता इतर लोकांचे पुनर्वसन पालिकेने केले असल्याने या उर्वरित लोकांचे पुनर्वसनही पालिकेने करावे असा सल्ला राज्य सरकारने दिला होता.

2014 पर्यंत या उर्वरित लोकांचे पुनर्वसन पालिकेनेच करावे असे राज्य सरकार सांगत होते. 2015 मध्ये सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांनी या लोकांची फ़ाइल अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे यांच्याकडे पाठवली असता ही फाइल बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे या 24 लोकांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही. या 24 पैकी काही लोक मुंबई बाहेर स्थायिक झाले असले तरी 19 लोक आजही 14 वर्षे भाड्याने राहत आहेत. या लोकांना पर्यायी घरे द्यावीत अशी मागणी भालेराव यांनी महापौरांकड़े केली आहे. महापौरांनी याबाबत अतिरिक्त आयुक्त पूर्व उपनगरे याना पत्र देवून त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत.

Post Bottom Ad