मुंबई । प्रतिनिधी - कमला मिल परिसरात लागलेल्या आगीमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी राजेंद्र पाटील या अग्निशमन दलाच्या अधिका-यासह तीघांना अटक केली. या अटकेमुळे अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा असल्याची माहिती फायर ब्रिगेड ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश देवदास यांनी दिली.
कमला मिल परिसरात २९ डिसेंबरला रात्री आग लागली. मोजोस आणि वन अबव्ह या दोन पबला आग लागली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुघटनेप्रकरणी पब मालक, मिल मालक, पबचे मॅनेजर यांसह अनेकांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात २० जानेवारीला अग्निशमन दलातील अधिकारी असलेल्या राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली. याबाबत असोसिएशनने संताप व्यक्त केला असून यंत्रणेमध्ये त्रूटी असताना त्या सुधारण्यात आलेल्या नाहीत. चुकीच्या गोष्टी दुरुस्त केल्या जात नाहीत. मात्र यात अग्निशमन दलाच्या अधिका-याला बळीचा बकरा बनवला जात आहे. याबाबत पालिका आयुक्तांकडे चर्चेसाठी वेळ मागितली, मात्र त्यांनी वेळ दिलेली नाही. दरम्यान मंगळवारी अग्निशमन दलातील अधिका-यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर राजीनामा देण्याबाबत निर्णय़ घेतला जाईल. अग्निशमन अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी आणि इतर विविध पदांवर असलेले सर्व अधिकारी सामूहिक राजीनामा देतील, असे देवदास यांनी सांगितले.
कमला मिल परिसरात २९ डिसेंबरला रात्री आग लागली. मोजोस आणि वन अबव्ह या दोन पबला आग लागली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुघटनेप्रकरणी पब मालक, मिल मालक, पबचे मॅनेजर यांसह अनेकांना अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात २० जानेवारीला अग्निशमन दलातील अधिकारी असलेल्या राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली. याबाबत असोसिएशनने संताप व्यक्त केला असून यंत्रणेमध्ये त्रूटी असताना त्या सुधारण्यात आलेल्या नाहीत. चुकीच्या गोष्टी दुरुस्त केल्या जात नाहीत. मात्र यात अग्निशमन दलाच्या अधिका-याला बळीचा बकरा बनवला जात आहे. याबाबत पालिका आयुक्तांकडे चर्चेसाठी वेळ मागितली, मात्र त्यांनी वेळ दिलेली नाही. दरम्यान मंगळवारी अग्निशमन दलातील अधिका-यांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीनंतर राजीनामा देण्याबाबत निर्णय़ घेतला जाईल. अग्निशमन अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी, उप अग्निशमन अधिकारी आणि इतर विविध पदांवर असलेले सर्व अधिकारी सामूहिक राजीनामा देतील, असे देवदास यांनी सांगितले.