लाँग मार्चचा धसका व शाईफेकीमुळे कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२० ऑक्टोबर २०२३

लाँग मार्चचा धसका व शाईफेकीमुळे कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द


मुंबई - राज्य सरकारच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात भीम आर्मीने मंत्र्यांवर शाईफेक केली ठिकठिकाणी आंदोलने सुरु केली शिवाय पुणे ते मंत्रालय अशा लॉँग मार्चची तयारी केल्यामुळेच सरकारने आपला निर्णय रद्द केला असा दावा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र अध्यक्ष सीताराम गंगावणे यांनी केला आहे . निर्णय रद्द करण्यात आल्यामुळे उद्या शनिवारी चैत्यभूमी तसेच राज्यभरात मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
    
राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये नऊ खाजगी कंपन्यांमार्फ़त कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारणर घेतला होता. सदर निर्णयामुळे सरकारमधील आरक्षित जागा धोक्यात आल्यामुळे भीम आर्मीने याविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान भीम आर्मीने कंत्राटी कारण रद्द करण्याच्या मागणीसाठी पाटील यांच्यावर शाईफेक करीत त्यांना काळे झेंडे दाखविले होते . मुंबईत भाजप प्रवक्ते आमदार रॅम कदम यांच्या कार्यालयावर आंदोलन केलेले होते पुण्यातही आंदोलन झाले होते शिवाय  सरकारमधील सर्व मंत्री तसेच सत्तेतील खासदार आमदारांच्या कार्यालयावर आंदोलन करून हे कंत्राटीकरण रद्द करण्याचे निवेदन त्यांना देण्याचे निर्देश सर्व कार्यकर्त्यांना देण्यात आले होते. अशी माहिती गंगावणे यांनी दिली. 
   
राज्य सरकारने सरकारमधील कंत्राटी भरती शिक्षक भरती आणि कंत्राटी पोलीस भरतीच्या विरोधात पुणे ते मंत्रालय अश्या लॉंग मार्चची तयारी केली होते सर्व समविचारी संघटना आणि पक्ष यांच्या सहभागाने हा लॉन्ग मार्च भीम आर्मीच्या नेतृत्वाखाली निघणार होता त्याचे मोठ्या स्तरावर नियोजन सुरु होते आधीच राज्यात मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणामुळे सरकारविरोधी वातावरण पेटलेले आहे संपूर्ण राज्यात सरकारच्या या  निर्णयाविरोधात वातावरण तयार झाले होते त्यामुळे लॉन्ग मार्चची ही धाग सरकारला बसू नये यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय रद्द केला असा दावा गंगावणे यांनी केला. कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केल्यानंतर गंगावणे यांनी सरकारचे अभिनंदन करतानाच आता कंत्राटी शिक्षक आणि पोलीस भरतीचा निर्णय देखील रद्द करावा अशी मागणी केली आहे. 

दरम्यान कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द झाल्यानंतर मुंबईतील दादर चैत्यभूमी उद्या शनिवारी सायंकाळी मुंबई भीम आर्मीच्या वतीने मिठाई वाटप करून आनंद साजरा केला जाणार असून त्याचवेळी राज्यात ठिकठिकाणी मिठाई वाटली जाणार असल्याची माहिती भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, मुंबई अध्यक्ष अविनाश गरुड यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS