देशातील १०.१ कोटी नागरिकांना उच्च रक्तदाब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 May 2025

देशातील १०.१ कोटी नागरिकांना उच्च रक्तदाब


नवी दिल्ली - आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची आकडेवारी नुकतीच जाहीर झाली असून त्यानुसार, भारतात १०.१ कोटी लोकांना उच्च रक्तदाब आहे आणि ३१.५ कोटी लोकांना मधुमेह आहे. चिंताजनक बाब म्हणजे यातील बहुतेक लोकांना हे माहित नाही की त्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आहे.

या आकडेवारीवरून असे दिसून येते की कधीकधी जीवन सामान्यपणे चालते. ऑफिसचे काम, घरातील जबाबदा-या, मित्रांना भेटणे आणि इतर अनेक गोष्टी सामान्य आहेत. दरम्यान, शरीरात असे काही बदल होत आहेत, जे आपल्या नजरेपासून लपलेले राहतात. हे असंसर्गजन्य आजार आहेत, जे कोणत्याही लक्षणांशिवाय शरीरात पसरतात. या आजारांना सायलेंट किलर म्हणतात, कारण ते फक्त तेव्हाच आढळतात जेव्हा शरीराला मोठे नुकसान झाले असते. यामुळे हृदयविकाराचा झटका, मेंदूचा झटका आणि मूत्रपिंड निकामी होणे यासारख्या धोकादायक परिस्थिती उद्भवू शकतात.

सौम्य लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका - 
डॉ. एम.के. सिंग म्हणतात की एके दिवशी अचानक त्यांना जाणवते की सर्व काही ठीक चालले नाही. अचानक तुम्हाला चक्कर येते, डोकेदुखी होते, श्वास घेण्यास त्रास होतो किंवा खूप थकवा जाणवतो. हे असे संकेत आहेत ज्याद्वारे आपले शरीर आपल्याला काहीतरी चुकीचे आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असते. बहुतेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, जे धोकादायक ठरू शकते.

सुरुवातीची लक्षणे ओळखा - 
सहसा मधुमेहाची लक्षणे सुरुवातीला कोणत्याही विशिष्ट स्वरूपात दिसून येत नाहीत. यामध्ये, एखाद्याला जास्त तहान लागू शकते, वारंवार लघवी करण्याची गरज भासू शकते, परंतु लोक दिवसभराच्या उष्णतेशी किंवा थकव्याशी त्याचा संबंध जोडून त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचप्रमाणे, उच्च रक्तदाबामुळे डोकेदुखी, चिडचिड आणि थकवा येऊ शकतो, परंतु बहुतेकदा ही लक्षणे इतकी सौम्य असतात की लोक त्यांना तणाव, झोप किंवा अशक्तपणामुळे आहेत असे समजून दुर्लक्ष करतात.

कुटुंबात असा आजार असेल तर
जर कुटुंबातील एखाद्याला मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल तर त्याला जास्त धोका असू शकतो. हे आजार अनुवांशिकदृृष्टया देखील धोका निर्माण करू शकतात. जर कौटुंबिक इतिहास नसेल, तर जीवनशैली हे देखील एक प्रमुख कारण असू शकते. जर सवयी चांगल्या नसतील, तर माणूस या आजारांना बळी पडू शकतो.

समस्येशिवाय तपासणी न करणे मोठी चूक
मोठी समस्या असल्याशिवाय बहुतेक लोक कोणत्याही चाचण्या करत नाहीत. ही सर्वात मोठी चूक असल्याचे दिसून येते. असे समजून घ्या, बाईकचे इंजिन अचानक बिघडत नाही. ब-याचदा लोक इंजिनमधून येणा-या किरकोळ आवाजांकडे दुर्लक्ष करतात जोपर्यंत ते मोठ्या समस्येत रूपांतरित होत नाही. त्याचप्रमाणे, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची लक्षणे वाढत राहतात. यावर एकमेव उपाय म्हणजे नियमित तपासणी वारंवार करून घेणे, जेणेकरून हा आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वीच त्याचे निदान करता येईल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS