मनसेचा मोर्चा हा विश्वासघात: ठाकरे
मनसेच्या मोर्चाचे स्वतःहून कौतुक करायचे , असेमोर्चे झालेच पाहिजेत , अशी दाद द्यायची आणि नंतरत्याच मोर्चाला विश्वासघातकी मोर्चा म्हणून हिणवायचे, अशी चमत्कारीक भूमिका शिवसेनेनं मनसेच्याबाबतीत घेतली आहे . मनसेचे आमदार बाळानांदगावकर यांच्या नावाचा उल्लेख न करता , मोर्चाकाढणारे पक्ष रझा अकादमीच्या कार्यक्रमात सहभागीहोत असतील , तर हा हिंदूंचा विश्वासघात आहे , असंटीकास्त्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना ' च्या अग्रलेखातून सोडलंय .
११ ऑगस्टच्या सीएसटी हिंसाचाराच्या निषेधार्थ मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी २१ ऑगस्टला मुंबईतमहामोर्चा काढला होता . या मोर्चानं मुंबईकरांची मनंजिंकली होती आणि राज ठाकरे यांचा उदो - उदो सुरूहोता . अगदी शिवसेनाही त्यात मागे राहिली नाही .असे मोर्चे व्हायलाच हवेत , असं प्रमाणपत्र शिवसेनाकार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी देऊन टाकलं होतं . पणआज बाळासाहेबांनी मनसेच्या मोर्चाचा अप्रत्यक्षसमाचार घेतलाय आणि त्यांच्या निशाण्यावर आहेत ,बाळा नांदगावकर ...
ज्या रझा अकादमीनं सीएसटी परिसरात हिंसाचार घडवला , त्याच अकादमीच्या एका कार्यक्रमामध्येबाळा नांदगावकर सहभागी झाले होते , असा फोटो २७ ऑगस्टच्या ' सामना ' त प्रसिद्ध झाला होता .त्यावर बाळासाहेबांनी आपला संताप व्यक्त केला आहे . ' दंगलखोरांच्या मांडीस मांडी लावून बसणारेराजकीय पक्ष चार दिवसांनी त्याच दंगलखोरांच्या विरोधात किंकाळ्या मारीत मोर्चे काढतात , हाहिंदूंचा विश्वासघातच नाही काय ?, असा सवाल त्यांनी विचारलाय .


No comments:
Post a Comment