महाराष्ट्रासह सहा राज्यांत 'ट्विटर' वर बंदी ?
सोशल नेटवर्किंग वेबसाइटवरून पसरणाऱ्या अफवांमुळे खडबडून जागे झालेल्या सरकारच्या डोक्यात अजूनही सोशल नेटवर्किंग वेबसाइटवर निर्बंध घालण्याचाविचार घोळतो आहे. ईशान्य भारतामध्ये उसळलेल्या हिंसाचारास कारणीभूत ठरलेल्या ' ट्विटर ' वर सहा राज्यांमध्ये बंदी घालण्याचा विचार सरकार करतअसल्याचे सूत्रांकडून समजते. या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश असल्याचे समजते.
याबाबत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाने तज्ज्ञांकडून मते मागविली असून महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश , कर्नाटक , तमिळनाडू , आसाम आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ' ट्विटर ' वर बंदी घालण्यात येणार आहे. याबाबत सरकारने गृह मंत्रालयशी संपर्क साधला असून लवकरच याबाबत निर्णय अपेक्षित आहे.
मात्र , राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन आणि पंतप्रधान कार्यालयाचे मुख्य सचिव पुलोक चॅटर्जी ' ट्विटर ' बंदी घालण्याबाबत फारसे सकारात्मक नाही. पंतप्रधान कार्यालयाच्या मतानुसार ,एक-दोन तोट्यांमधून पाण्याची गळती होत असेल तर एखाद्या विभागाचा पाणीपुरवठा बंद करणे योग्य ठरत नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यापूर्वी एक समिती नेमून निर्णय घेणे योग्य ठरणार असल्याचे मत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.


No comments:
Post a Comment