अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्यावतीने डॉ. बाबाnसाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वान दिनी येणाऱ्या लाखो लोकांसाठी सोयी सुविधा पुरविण्यात येतात. या कामाची सुरवात झाली असून पालिका जय्यत तयारी करत आहे. यानुसार पालिकेने चैत्यभूमी व गेटची रंगरंगोटी केली आहे. अशोक स्तंभाला सोनेरी रंग देण्यात आला आहे. चैत्यभूमीच्या मुख्य प्रवेश द्वारापाशी विआयपी साठी मंडप बांधण्याचे काम, पालीसांचा टेहळणी मनोरा बांधण्याचे काम सुरु आहे. शिवाजी पार्क मैदानात पालिकेचा नियंत्रण कक्ष असलेला मंडप बांधून तयार होत आला आहे. आंबेडकरी जनतेसाठी राहण्याची सोय म्हणून निवाऱ्यासाठी मंडप बांधण्यात येत आहे. आंबेडकरी जनतेकडून यावेळी मोठ्या पुस्तके, फोटो, सीडी यांची खरेदी करण्यात येत असल्याने ५०० स्टाल उभारता यावेत या साठी आखणी करण्यात आली आहे.


No comments:
Post a Comment