निष्पाप तरुणांचे अटकसत्र बंद करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 November 2012

निष्पाप तरुणांचे अटकसत्र बंद करा


मुंबई : आझाद मैदान दंगलीनंतर पोलिसांनी मुस्लिम समाजातील कॉलेज तरुण, नोकरदार, व्यावसायिक आदी निष्पाप तरुणांना अटक करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. हे योग्य नाही, असे स्पष्ट करत हे अटकसत्र बंद केले नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारत मुक्ती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष किशोर जगताप यांनी गुरुवारी पत्रक ार संघ येथे दिला. मुस्लिम तरुणांविरोधात पोलीस बिनबुडाचे राजकारण करत आहे. तपासकार्य प्रामाणिक व नि:पक्ष असले पाहिजे. दहशतवादी प्रकरणे त्वरित निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रक न्यायालये स्थापन करण्यास सरकार उशीर का लावत आहे. न्यायालयातून निर्दाेष सुटलेल्या काही लोकांची 20 वष्रे तुरुगांतच गेली असल्याची उदाहरणे आहेत. अशा प्रकारचा न्याय नसावा, असे किशोर जगताप यांनी या वेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS