देशात सरकारी विभागांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये, असे मत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडक र यांनी व्यक्त केले. रविवारी भिवंडीत भारिप कार्यकत्र्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. त्या वेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. आंबेडकर पुढे म्हणाले की, ज्या विभागात पोलीस कारवाई केली जाते त्या विभागांचे खाजगीकरण करणे चुकीचे आहे. भिवंडीतील टोरँट पॉवरचे झालेले खाजगीकरण हटवणे शक्य आहे, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले. भिवंडी शहरातील पॉवरलूम उद्योग, विजेची समस्या, सट्टेबाजीमुळे कारखानदारी बंद पडत असल्याने बेकारी वाढत आहे. या गहन समस्येवरही या वेळी चर्चा करण्यात आली. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असून हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी केली. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन पक्ष केंद्र सरकारला पाठिंबा देण्याच्या नावाखाली ब्लॅकमेलिंग करून स्वत:ची पोळी भाजून घेत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
Home
Unlabelled
सरकारी विभागांचे खाजगीकरण नको - आंबेडकर
सरकारी विभागांचे खाजगीकरण नको - आंबेडकर
Share This
Share This
About Anonymous
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.


No comments:
Post a Comment