भूमिहीन शेतमजुरांचा विधानसभेवर मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भूमिहीन शेतमजुरांचा विधानसभेवर मोर्चा

Share This

मुंबई : राज्यातील भूमिहीन शेतमजुरावरील अत्याचार रोखावेत, शेतमजुरास सरकारने जमिनीचे मालकीपट्टे देऊन शेतकरी करावे इ. मागण्यांसाठी सोमवारी पीपल्स रिपब्लिकन पक्षाने प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर मोर्चा काढला.राज्यातील भूमिहीन शेतमजुरांना जमिनीचे मालकीपट्टे देण्याचा निर्णय वर्ष १९९१ मध्ये घेण्यात आला होता. मात्र प्रशासकीय पातळीवर अद्यापही या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. यावरून गरीब शेतमजुरांवर अन्याय होत आहे. त्यामुळे शेतमजुरास सरकारने जमिनीस मालकीपट्टे देऊन शेतकरी करावे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेचा लाभ भूमिहीन शेतमजुरांना द्यावा, २0१0 पर्यंतच्या अतिक्रमित जमिनींना कायम संरक्षण द्यावे, आदिवासी जमीन संपादन कायद्याप्रमाणे या वतनी जमिनीचा संरक्षा कायदा विनाविलंब रद्द करण्यात यावा, अशी मागणी कवाडे यांनी या वेळी केली

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages