मुंबई: मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांमध्ये 24 एप्रिल रोजी मतदान होत आहे. पण मुलाबाळांच्या परीक्षा आटोपल्यामुळे चाकरमान्यांनी आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे बेत आखले आहेत. त्यामुळे बहुतेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे धाबे दणाणले असल्याचं चित्र आहे.
एकीकडे आयफा पुरस्कारांच्या निमित्ताने अनेक कलाकार अमेरिकेला जाणार आहेत. आता सामान्य मुंबईकरही मतदानाकडे पाठ फिरवून सुट्ट्यांसाठी बाहेरगावी जाण्याच्या तयारीत आहेत. आधीच मुंबईत मतदानाची टक्केवारी कमी त्यात आता चाकरमान्यांनी सुट्टीचा बेत आखल्याने यंदाही मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

