मुंबई : पावसाळ्याचे वेध लागताच मुंबई महापालिकेने शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरांतील नाल्यांच्या सफाईचे काम हाती घेतले असून १0 एप्रिलपर्यंत ८.0६ टक्के सफाई झाल्याची माहिती पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली. नऊ टक्के सफाई करण्याचे उद्दिष्ट होते; पण ते साध्य झाले नाही. पावसाळ्यापूर्वी शहरातील आणि उपनगरातील ३ लाख २0 हजार २५३ मीटर लांबीच्या नाल्यांमधून ३ लाख ६५ हजार १५३ घनमीटर कचरा, गाळ बाहेर काढण्याचे पालिकेचे उद्दिष्ट आहे; पण १0 एप्रिलपर्यंत ९ टक्क्यांपैकी ८.0६ टक्के गाळ, कचरा काढल्याचे या विभागाचे मुख्य अभियंता लक्ष्मण व्हटकर यांनी सांगितले. पावसाळ्यापूर्वी एकूण ७0 टक्केच कचरा व गाळ काढण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली. २00५ मध्ये मुंबईत झालेल्या महाप्रलयास जबाबदार असणार्या मिठी नदीच्या सफाईचे कामही हाती घेण्यात आले आहे. शहर आणि पश्चिम व पूर्व उपनगरांत एकूण २२ हजार ६२५ मीटर नदीचे पात्र साफ करण्याचे उद्दिष्ट असले तरीही ९ टक्क्यांपैकी ७.८८ टक्के मिठी पात्राची सफाई झाली आहे.
Share This
About Anonymous
Author Details
JPN News is a trusted Marathi digital news portal operating since 2013. JPN News is registered as a news agency with the Government of India. This portal mainly focuses on important social, political, economic, cultural developments in Mumbai, suburbs and Maharashtra. Its main objective is to deliver fast, honest and local to state-level news to the people. Reliability, speed and local vibe are the hallmarks of JPN News.

