पाणीवापर जपून - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पाणीवापर जपून

Share This
गेल्या वर्षीच्या पावसाने हात दिल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत तूर्तास समाधानकारक पाणीसाठा असला तरी यंदा कमी पावसाचा अंदाज, व त्याबाबतची अनिश्चितता यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा जपून वापर करण्याकडेच महापालिकेचा कल असेल, हे स्पष्ट होत आहे. तसेच, नागरिकांनीही पाण्याची विनाकारण उधळपट्टी करू नये, अशी अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांना मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांतून पाणीपुरवठा होतो. एप्रिलअखेरपर्यंत उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यामुळे ३१ जुलैपर्यंत पाण्याची चिंता भेडसावणार नाही, असा विश्वास महापालिकेचे हायड्रोलिक इंजिनिअर रमेश बांबळे यांनी व्यक्त केला. अर्थात, तोवरही पुरेसा पाऊस न झाल्यास राखीव पाणीसाठ्यातून १५ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाते. पावसाचा एकूण अंदाज घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जातो. तूर्तास, मुंबईतील पाणीसाठा समाधानकारक असल्याने त्याबाबत काहीच चर्चा झालेली नाही, असेही बांबळे यांनी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages