नवी दिल्ली - देशातील सोळावी निवडणूक सर्वार्थाने लक्षणीय ठरली. तीस वर्षाच्या कालावधीनंतर प्रथमच एका राजकीय पक्षाला बहुमत मिळाले आहे. तसेच अनेक आश्चर्यकारक बदलही दिसून आले. या निवडणुकीत देशात भाजपच्या लाटेमुळे बसपा, द्रमुक आणि सीपीआय यांसारख्या एक हजार ६५२ पक्षांना लोकसभेत भोपळाही फोडता आला नाही.
देशात एक हजार ६८७ पक्ष नोंदणीकृत आहेत. देशातील एकूण ८२०० उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी पाच हजार सात उमेदवार हे विविध पक्षांचे उमेदवार होते तर इतर उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
