तलावात ७४ दिवस पुरेल इतका जलसाठा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तलावात ७४ दिवस पुरेल इतका जलसाठा

Share This
मुंबई / जेपीएन न्यूज (http://jpnnews.webs.comमुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांमध्ये ७४ दिवस पुरेल इतका साठा आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या तरी काळजीचे काहीच कारण नाही. त्यातच पावसाचेही आगमन वेळेतच होणार आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली. यंदा ९४ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र ८0 टक्के पाऊस पडला तरी त्याचा तितकासा परिणाम जाणवणार नाही, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मोडक सागर तलावात ६६८६९ मिमी., तानसा तलावात २९ ७२५ मिमी., विहार तलावात ३११३ मिमी., तुळशी तलावात २९५४ मिमी., अप्पर वैतरणा जलाशयात २६0११ मिमी., भातसामध्ये ११९२८४ मिमी. इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, गेल्या वर्षी या तलावांमध्ये १६0६४६ मिमी. इतका पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा शिल्लक आहे, असे पालिकेच्या जल अभियंता विभागातील अधिकार्‍यांचा दावा आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages