नितीन आगे ह्या १७ वर्षाच्या दलित युवकाची जातीय द्वेषातून निर्घृण हत्या करण्यात आली. जालाना जिल्ह्यात मनोज कसाब या दलित सरपंचाची हत्या करण्यात आली आणि अत्ताच गोंदिया जिल्ह्यात घडलेले संजय खोब्रागडे यांचे जातीय द्वेषातून झालेले जाळीतकांड आणि जळगाव येथे जातीय द्वेषातून जाळलेली घरं या सर्व वाढत्या जातीय हत्याकांडांच्या विरोधात दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने मंगळवार २० मे रोजी दुपारी ३ वाजता दादर हनुमान मदिर ते चैत्यभूमी असा "आक्रोश मोर्चा" काढण्याचे ठरले आहे. पुरोगामी विचाराच्या अनेक संघटना ह्यात सामील झाल्या आहेत. मोर्च्याचे नेतृत्त्व प्रकाश आंबेडकर, प्रकाश रेड्डी, पुष्पा भावे हे करतील असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Post Top Ad
20 May 2014
Home
Unlabelled
२० मे रोजी दादर ते चैत्यभूमी "आक्रोश मोर्चा"
२० मे रोजी दादर ते चैत्यभूमी "आक्रोश मोर्चा"
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

