मुंबई - अनुसूचित जातींसाठीच्या विविध सरकारी योजनांमधील गैरप्रकारांबाबत खुलासा करण्याचे निर्देश उच्च्च न्यायालयाने दिले होते. तथापि सामाजिक न्याय विभागाने अद्याप प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल न्यायालयाने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. सामाजिक न्याय विभागाने 1 ऑगस्टपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे; अन्यथा या विभागाच्या सचिवांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई सुरू करण्यात येईल, असा इशारा खंडपीठाने दिला. अनुसूचित जातींसाठीच्या विविध योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत आहे. या योजना संबंधितांपर्यंत पोहोचतच नाही, असा आरोप भीमशक्ती विचार मंचचे चेतन कांबळे यांनी केली आहे. यात 2004-05 ते 2010-11 या काळात सुरू केलेल्या योजनांचा समावेश आहे.
Post Top Ad
15 July 2014
Home
Unlabelled
सामाजिक न्याय विभागाला खंडपीठाचा इशारा
सामाजिक न्याय विभागाला खंडपीठाचा इशारा
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

