पुणे : दरड कोसळण्याची भीषण दुर्घटना घडलेले माळीण गाव गुरुवारीही शोकसागरात बुडालेले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांच्या ठिकठिकाणच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. समोर उद्ध्वस्त झालेले गाव, त्यामध्ये गाडली गेलेली रक्ताची, जिव्हाळ्याची माणसं पाहून सर्व नातेवाईक धायमोकलून रडत होती. त्यांचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. येणार्या सर्वांचाच कोणी ना कोणी गेलेला असल्याने धीर कोणी कोणाला द्यायचा हाच प्रश्न येथे निर्माण झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून ती आता ३७ झाली असून मातीच्या ढिगार्याखाली १५७ जण दबले गेले असल्याची भीती आहे. बचाव कार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू असून ढिगारा उपसण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.
Post Top Ad
01 August 2014
Home
Unlabelled
माळीण गावात नातेवाईकांचा आक्रोश
माळीण गावात नातेवाईकांचा आक्रोश
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in

