मेक इन महाराष्ट्राच्या घोषणा, मात्र समाजात सर्व धर्मियांना स्थान नाही - विखे पाटील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेक इन महाराष्ट्राच्या घोषणा, मात्र समाजात सर्व धर्मियांना स्थान नाही - विखे पाटील

Share This
मुंबई मेक इन महाराष्ट्राच्या निव्वळ घोषणा होत असतील आणि समाजात जर सर्व धर्मियांना स्थान नसेल तर असा आर्थिक विकास करून आपण काय साधणार आहात असा जळजळीत सवाल करत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पानसरेंच्या हत्येच्या मुद्द्यावरून सरकारला चांगलेच धारेवर धरले. पानसरेंच्या मारेकऱ्यांमध्ये देशाला तोडणारा विद्वेषक विचार आहेअसा आरोपही त्यांनी केला.या सरकारने कुंभ मेळ्याच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी सीसीटीव्ही भाड्याने घेतल्याचा उल्लेख करत सरकारने आता सुरक्षा व्यवस्थासुद्धा भाड्याने दिली आहे कायअसा सणसणीत टोलाही त्यांनी सरकारला लगावला.


राज्यात माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर होणारे हल्ले आणि त्या हल्लेखोरांवर कारवाई करण्यात पोलीसांना आणि राज्य सरकारला आलेले अपयश या विषयावर विरोधी पक्षांद्वारे आयोजित केलेल्या चर्चेत बोलताना त्यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवलाते म्हणाले कीआज समाजातला प्रत्येक घटक स्वत:ला असुरक्षित समजू लागला आहेही बाब सरकारला निश्चितच भुषणावह नाहीराज्यात दरोडेहत्यामहिला अत्याचार असो किंवा दलित अत्याचाराच्या घटना असोत असा एकही गुन्ह्याचा प्रकार नाही ज्यात वाढ झालेली नाहीअसेही ते म्हणाले.

कॉम्रेड पानसरेंच्या हत्येचा उल्लेख करताना ते म्हणाले कीपानसरेंची हत्या होणे म्हणजे पुरोगामी विचारांना मुठमाती देण्यासारखे आहेहे प्रकरण सरकारकडून अतिशय असंवेदनशीलतेने हाताळले जात आहेपानसरेंच्या मारेकऱ्यांमध्ये देशाला तोडणारा विद्वेषक विचार आहेआपल्या सहकारी पक्षानेही पानसरेंच्या हत्येबाबत आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहेत्याला काय उत्तर आपण देणार आहातअसा सवाल करत त्यांनी आता तरी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री देणार का?याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडेच विचारणा केलीकेंद्रात गेल्या काही काळापासून "अनलॉफुल अॅक्टीव्हिटी अॅक्टहे विधेयक मंजुरीविना पडून आहेत्याच्या मंजुरीसाठी आपण आता तरी पाठपुरावा करणार आहात की नाहीतसेच अजून किती दाभोळकर आणि पानसरेंच्या हत्यांची आपण वाट पाहणार अाहातअसा सवाल करत त्यांनी सरकारच्या नैतिकतेला आणि सदसदविवेक बुद्धीला अावाहन केले.

आपल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची आठवण करून दिलीविखे पाटील म्हणाले कीगडचिरोलीत कायद्याचे राज्य नाहीअसे आपण एकदा म्हणाला होतातमग या नक्षलग्रस्त भागात कायद्याचे राज्य आणण्यासाठी आता आपणच गडचिरोलीचे पालकमंत्री पद स्विकाराअसा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages