रिपाइं अधिवेशनात १७ ठराव पारित
इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम सुरू करावे व चैत्यभूमीसमोर अरबी समुद्रात आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारावा आणि लंडन येथील स्मारकाचे कामकाजही पूर्ण करावे, या प्रमुख ठरावासह भाजपाने केंद्रात आणि राज्यात रिपाइंला सत्तेत सहभाग द्यावा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद द्यावे, झोपू योजनेसाठी पात्रतेची र्मयादा २0१४ पर्यंत करावी, असाही ठराव संमत करण्यात आला. वाढत्या महागाईला आळा घालावा, जीवनावश्यक गोष्टींचे भाव स्थिर ठेवावेत, दलितांवर अत्त्याचार, दलित व इतर सर्व महिलांवरील अत्याचार तसेच लहान मुलींचे शोषण रोखण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना राबवावी, गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध करणारा आणि गोहत्या बंदीचा कायदा असावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. राज्यातले सगळे टोलनाके बंद करून राज्य टोलामुक्त करावे, भूमिहीन शेतमजुरांना जमिनींचे वाटप करण्यात यावे, झोपडपट्टी संरक्षण कायदा आणून एसआरए योजनेसाठी पात्रतेची र्मयादा २0१४ करावी, प्रत्येक झोपडीधारकाला किमान ४00 चौरस फुटांचे घर मिळावे, तसेच ही योजना मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रात लागू करावी, शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, शेतमजुरांना ४00 रुपये किमान वेतन देण्यात यावे, मागासवर्गीय महामंडळांना निधी वाढवून मिळावा, बेरोजगार भत्ता देण्यात यावा, वीज निर्मितीचे प्रकल्प उभे करावेत, खाजगीकरणाला विरोध आणि मुंबई विकास आराखड्यामधे गरीब, दुर्बल घटकांना सामावून घ्यावे, असे एकूण १७ ठराव या अधिवेशनात पारित करण्यात आले.


