कोस्टल रोडला मच्छिमार कृती समितीचा कडाडून विरोध - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोस्टल रोडला मच्छिमार कृती समितीचा कडाडून विरोध

Share This
मुंबई,(प्रतिनिधी) : वांद्रे वरळी सिलिंगच्या विस्ताराला स्तगीती देऊन नरिमन पॉईट ते कांदावली अश्या २९ कि.मी  लांबीच्या कोस्टल रोड मुळे कोळीवाडा उद्वस्त होणार आहेत. या प्रस्तावाला आम्ही कडाडून विरोध करणार आहोत. अशी त्रीव भूमिका अखिल मच्छीमार कृती समितिने घेतली आहे. या प्रकल्पासंदर्भात लवकरच राज्यचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भेट घेवून चर्चा करणार असल्याचे माहिती आज समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी पत्रकार परिषेद माहिती दिली. 

मुंबई मधील होणाऱ्या  कोस्टल रोड साठी मोठा भाराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी मुंबईत शिरण्याची मोठी श्याक्ता आहे. मुंबईचा भूमिपुत्र असलेला कोळी समाज ४५ कोळीवाडे आणि ८० गावठाणत राहत आहे. विकासाच्या नावाखाली मासेमारी व्यासाय साठी आरक्षित शेकडो एकर जमीन सी.आर. झेड मधून वगळण्यात आली आहे. या कोस्टल रोड साठी मोठ्या प्रमाणात कोळी समाजाच्या जमिनी घेतल्या जाणार आहेत. मोकळ्या जमिनी बिल्डररनच्या घशात घालण्याचा डाव शिजत असून कोळी समाजाला हद्पर करण्याचे सरकारचे षड्यंत्र आहे, असा आरोप तांडेल यांनी केला. परदेशात निकामी झालेली बहुमजली जहाजे मुंबईत आणली जाणार आहेत. या तारांत्या होतेलांमुळे मुंबईचे सुरक्षा दोखायात येणार आहेत. अशी भिती तांडेल यांनी  व्यक्त केली. 

छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक कफ परेड नरिमन पॉईट येथे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या साठी सामुन्दरात ४० हेक्टार जागा निश्चित केली आहे. समुद्रात १६ एकरात भाराव टाकून बेट  तयार केली जाणार आहेत. नरिमन पॉईट आणि राज भवन येथून ५ कि. मी अंतरावर समुद्रात बेट बांधण्यासाठी २००० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या स्मारकामुळे १२००० मच्छीमार बेरोजगार होणार आहेत. येथे हे स्मारक न उभारता वांद्रे येथील बेंड स्टन कार्टर रोडची जागा योग्य असून तेथेच शिव स्मारक उबरावा अशी मागणी राज्यसरकार कडे केली आहे. येथे हे  स्मारक उभारल्यास ५०० कोटी रुपयात स्मारक होऊ शकते अशी सूचना करत समुद्रात भाराव टाकण्याची गरज भासणार नाही,अशेही तांडेल यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages