मुंबईतील घरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एक "स्पेशल पर्पज वेहिकल' निर्माण करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईतील घरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एक "स्पेशल पर्पज वेहिकल' निर्माण करा

Share This
मुंबई१ एप्रिल - मुंबईच्या समस्या अत्यंत क्लिष्ट असून मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे एक विशेष अधिवेशन बोलवातसेच मुंबईतील घरांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एक "स्पेशल पर्पज वेहिकलनिर्माण करा अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज मुंबईबाबतच्या विशेष चर्चेदरम्यान केली


मुंबईतील परवडणाऱ्या घरांचा प्रश्न न सुटल्यास मुंबईतला मराठी माणूस बाहेर फेकला जाईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केलीमुंबईचा विकास आराखडा म्हणजे काही मुठभर लोकांचे भले करण्यासाठी रचलेला सापळा आहेअसा आरोप करत विकासकांचे भले करायचे असल्यास करा मात्र मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू नका अशी कळकळीची विनंतीही त्यांनी यावेळी केली.

मुंबईच्या प्रश्नाबाबत विधानसभा नियम २९३ अन्वये सत्ताधारी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या चर्चेत मुंबईबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली मते मांडलीते म्हणाले मुंबईला सिंगापूर आणि शांघाई करण्याचे स्वप्न काहींनी पाहिलेमात्र त्याऐवजी फक्त मुंबई स्वच्छ आणि चांगली करू असे आश्वासन जरी दिले असते तरी चालले असतेमुंबईला शांघाय करण्याच्या नादात आपण मुंबईकरांना विसरलोत्यामुळे मुंबईच्या सर्वांगिण विकासासाठी एक कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा,अशी सुचना विरोधी पक्षनेत्यांनी केली.

सध्या मुंबईचा नव्याने विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहेया विकास आराखड्यात नेमके कोणाचे भले होणार आहे असा सवाल करत विखे पाटील म्हणाले कीमुळचा मराठी माणूस अाणि मुंबईकराचा या विकास आराखड्यात प्राधान्याने विचार करण्यात यावामुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी उपलब्ध साधनसंपत्तीचा कसा वापर करावा याचे नियोजन होण्याची गरज आहेमात्र त्याचबरोबर पर्यावरणाचा मुद्दाही दुर्लक्षित राहू नयेअसेही ते म्हणालेया विकास आराखड्यात जमिनींचे आरक्षण बदलण्याकरता मोठी माया गोळा करण्यात आल्याचा आरोप करत त्याच्या चौकशीची मागणी त्यांनी केली.मुंबईच्या पायाभूत सुविधांकडे पुर्णतदुर्लक्ष या अराखड्यात करण्यात आले आहेतसेच हा आराखडा सर्वांगिण विकासाकरिता नसून हा फक्त एफएसआय लाटण्याकरत्या आहेएफएसआय वाढवला म्हणजे विकास झाला अशी सरकारची समजूत आहे काअसा सवालही त्यांनी केलात्यातून तुम्ही कुणाचेही भले करा पण सामान्यांचा मात्र विचार कराअशी कळकळीची विनंती त्यांनी केली.

मुंबईतील समस्या अतिशय क्लीष्ट आहेतअसे सांगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मुंबईबाबतच्या दृष्टीकोनाची त्यांनी प्रशंसा केलीक्लस्टर डेव्हलपमेंटचे धोरण अाखताना त्यांनी लोकप्रतिनिधीव्यावसायिकशासकीय अधिकारी आणि रहिवाशी या एसर्व घटकांची दोन दिवसांची एक बैठक बोलावली होतीमात्र आताच्या सरकारची ती भुमिका दिसत नाहीहे सरकार फक्त अधिकाऱ्यांच्या भरवशावर काम करत आहेअसा टोला हाणत त्यांनी मुंबईच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा करण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली.

मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांबद्दल बोलताना ते म्हणाले की,मुंबईकरांसाठी हाऊसिंग स्टाॅक निर्माण करण्याची गरज असून त्यासाठी एक स्पेशल पर्पज वेहिकल निर्माण करण्याची गरज आहे.याशिवाय गिरणी कामगार यासारख्या घटकांच्या घरांसाठी जमिन उपलब्ध व्हावी यासाठी एक लँड बँक निर्माण करण्याबाबत हालचाल होण्याची गरज आहेएसआरएच्या हाऊसिंग स्टॉकबाबतच्या नियमातही बदल करावेत अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.शर्तीच्या जमिनीचे शंभर वर्षांचे भाडेपट्टे करून काही विकासकांनी मुंबईतल्या सरकारी जमिनी गिळंकृत केलेल्या आहेतत्यामुळे शासनाचा हजारो कोटींचा महसुल बुडतो आहेत्यांच्याकडून जमिनी काढून घ्या आणि गरिबांसाठी घरे बांधाअशी सुचनाही त्यांनी केली.वाटल्यास कोणत्याही विकासकाचे काम करापण त्यासाठी मराठी माणसाचा बळी देऊ नकात्याला मुंबईतून विस्थापित होऊ देऊ नकाअशी कळकळीची विनंती त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages