मुंबई : प्रतिनिधी - म्हाडाच्या मुंबई व कोकण मंडळाच्या माध्यमातून ३१ मे रोजी पार पडलेल्या १0६३ घरांच्या सोडतीतील १ लाख २५ हजार अर्जदारांपैकी केवळ ५00 अर्जदारांना अजूनही अनामत रकमेचा परतावा मिळालेला नसून अशा अर्जदारांना ३0 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून ६६ अपंग प्रवर्गातील व ९९७ सर्वसामान्यांच्या घरांसाठी ३१ मे रोजी सोडत पार पडली. १0६३ घरांसाठी म्हाडाकडे १ लाख २५ हजार ८४४ अर्ज पात्र ठरले होते. या पात्र अर्जदारांनी म्हाडाच्या अँक्सिस बँकेच्या खात्यामध्ये अंदाजे ३,४३, २९,२२0 रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केली होती. त्यापैकी खाते क्रमांकामध्ये कोणतीही अडचण नसणार्या अर्जदारांकडे आठ दिवसांत रक्कम जमा करण्यात आली. मात्र आता १५ दिवस उलटून गेल्यानंतर ५00 अर्जदारांना अनामत रकमेचा परतावा केला नसल्याचे दिसून

